वारिस पठाण, एक सुप्रसिद्ध राजकारणी आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये आणि वकील, राष्ट्रीय राजकारणात आणि मुंबईच्या राजकीय परिदृश्यात एक प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांचा मुलगा अरबाज पठाण याच्या लग्नाच्या रिसेप्शनला नेत्यांची मंदियाळी दिसून आली
पारंपारिक विधी आणि आधुनिक उत्सवांचे सुंदर मिश्रण असलेला हा विवाह सोहळा मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. नवविवाहित जोडपे एकत्र त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत असताना अनेक नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खास उपस्थिती दर्शविली
भारतीय जनता पार्टीचे नेता असणाऱ्या आशिष शेलारांनीही वारीस पठाणचा मुलगा अरबाज खानच्या लग्नाच्या रिसेप्शनला आवर्जून उपस्थिती लावल्याचे दिसून आले. हा लग्नसोहळा खूपच मोठा असल्याचेही दिसून येत आहे
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय सांभाळणारे मंगल प्रभात लोढा यांनीही यावेळी वधूवरांना उपस्थित राहून आशिर्वाद दिला आणि वारीस पठाण आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह फोटोही काढले
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच अशा मोठ्या कार्यक्रमाला त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी उपस्थित असल्याचे दिसून आले आणि त्यानेही या रिसेप्शनला उपस्थितीत राहून वधूवरांना भेट दिली
महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थिती दर्शवित अरबाज पठाण आणि वधू नैला यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी पोझ देत त्यांनी पुष्पगुच्छ दिल्याचेही दिसून येत आहे
भाजप नेते राम कदम आणि अनेक AIMIM च्या नेत्यांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शवित वारीस पठाण आणि अरबाज पठाण यांच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी झाल्याचे दिसून आले