Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज मुस्लिमांविरुद्ध द्वेष तर उद्या पीडीए विरोधात…; अखिलेश यादव यांचा योगी सरकारवर घणाघात

होळी सणाचा पूर्ण देशभरामध्ये मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगली आहे. यावरुन सपा नेते अखिलेश यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2025 | 05:26 PM
Akhilesh Yadav targets Yogi Adityanath for criticizing Muslim brothers on Holi

Akhilesh Yadav targets Yogi Adityanath for criticizing Muslim brothers on Holi

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश : राज्यासह देशभरामध्ये होळी सणाचा मोठा उत्साह आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्य होळी खेळली जात आहे. उत्तर प्रदेशमधील वृंदावनची होळी आणि मणिकर्णिका घाटावरची होळी जगप्रसिद्ध आहे. मात्र राजकीय वर्तुळामध्ये देखील होळीवरुन टीकेची झोड उठवली आहे. ज्यांना रंगांची अडचण असेल त्यांनी देश सोडून जावं असे वक्तव्य योगी सरकारमधील नेत्यांनी केले आहे. तर यावरुन सपा नेते अखिलेश यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते म्हणाले, “ज्या लोकांना होळीच्या रंगांचा त्रास होत असेल त्यांनी हा देश सोडून इथून निघून जावं. मुळात मुस्लीम समुदाय देखील रंगांपासून दूर नाही. त्यांच्याही घरात व आयुष्यात विविध रंग आहेत. ते देखील त्यांची घरं रंगवतात. पण काही लोक रंगांमध्ये विष कालवून समाजात अस्थिरता निर्माण करू पाहतायेत. ज्यांना रंग आवड नाहीत त्यांनी देश सोडून जावे, असे वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी योगी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुस्लीम समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. होळीच्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, अखिलेश यादव यांनी आज ते मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवत आहेत, उद्या ते पीडीएविरुद्ध द्वेष पसरवतील, असा आरोप उत्तर प्रदेश सरकारवर केला आहे.

‘२०२७ मध्ये पुन्हा तुम्हाला हरवू’

पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, 2024 च्या यूपी निवडणुकीत भाजप आमच्याकडून हरला आहे आणि 2027 मध्येही भाजप पराभूत होईल. भाजपपेक्षा मोठा खोटारडा कोणी नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा सरकारवर टीका केली आहे. आपण होळीचा सण एकत्र साजरा करतो. हा रंगांचा सण आहे, चला रंगांचा सण एकत्र साजरा करूया आणि एकत्रितपणे गंगा-जमुना संस्कृतीसह हा सण साजरा करूया. आम्ही उत्सवप्रिय लोक आहोत.

केशव मौर्य यांना खुर्ची खेचायची आहे

यावेळी, उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्याबद्दल अखिलेश म्हणाले की, यावेळी पीडीए कुटुंब फुटणार नाही, ते म्हणजेच केशव कोणाची तरी खुर्ची खेचू इच्छितात. यासोबतच, वक्फ बोर्ड विधेयकाबाबत ते म्हणाले की, केंद्र सरकार जाणूनबुजून मुस्लिम समुदायाला त्रास देऊ इच्छित आहे. त्यांना मुस्लिम समाजात फूट पडावी अशी इच्छा आहे. आज ते मुस्लिमांना त्रास देत आहेत, उद्या पीडीएच्या लोकांवर हल्ला होईल. होळीबाबत जी विधाने केली जात आहेत ते प्रत्यक्षात असणाऱे मुद्दे लपवण्याचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘कानपूर-लखनऊ महामार्गावरील भ्रष्टाचार’

कानपूर लखनौ महामार्गावर भ्रष्टाचार होत आहे. भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. शेअर बाजार कोसळला. संपूर्ण बाजारपेठ विकली गेली. भाजप लोकांचा खास स्वभाव खोटे बोलणे आहे. मतदार यादीत सुधारणा करणेच योग्य नाही तर मतदारांना मतदान करता येईल याचीही खात्री करावी. चौरसिया समाजाच्या आजच्या बैठकीत मी असेही म्हटले होते की, १८ वर्षांचे झालेल्यांसाठी लवकरच मतदार ओळखपत्र बनवले जाईल, असा आरोप समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादल यांनी केला आहे.

Web Title: Akhilesh yadav targets yogi adityanath for criticizing muslim brothers on holi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • Akhilesh yadav
  • holi
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
1

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

आझम खान यांची तुरुंगातून सुटका;  उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा
2

आझम खान यांची तुरुंगातून सुटका; उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका
3

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका

मोदींनंतर देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकतात? सर्वेक्षणातून आश्चर्यकारक निकाल समोर, भारताला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं
4

मोदींनंतर देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकतात? सर्वेक्षणातून आश्चर्यकारक निकाल समोर, भारताला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.