
Sambhajiraje Chhatrapati founded the new Maharashtra Swarajya Party
कोल्हापूर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला असून जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणूक आयोग देखील आढावा घेऊन गेले असून लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. राज्यामध्ये अनेक प्रमुख पक्ष आणि युती असून आता आणखी एक पक्ष निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आणखी एक पक्षाची स्थापना झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे सक्रीय राजकारणामध्ये आले आहेत. मागील वर्षी त्यांनी स्वराज्य संघटना स्थापन केली होती. राजकीयदृष्टीनेच ही संघटना तयार करण्यात आली होती. पुण्यामध्ये या संघटनेचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्याचबरोबर स्वराज्य भवन देखील स्थापन करण्यात आले होते. आता राज्यामध्ये परिवर्तन महाशक्ती अशी तिसरी आघाडी तयार झाली आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्रित येत ही तिसरी आघाडी निर्माण केली आहे. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य संघटनेचे रुपांतर पक्षामध्ये केले आहे.
हे देखील वाचा : मोदी सरकारमध्ये पहिली ठिणगी? लोकप्रिय तरुण नेत्याने केले मंत्रिपदाला लाथ मारण्याचे वक्तव्य
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची स्वराज्य संघटनेचे रुपांतर आता राजकीय पक्षामध्ये केले आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे त्यांच्या पक्षाचे नाव यापुढे असणार आहे. याला निवडणूक आयोगाने देखील मान्यता दिली आहे. त्याचबरोबर आयोगाकडून पक्षाला चिन्ह देखील देण्यात आले आहे. सप्तकिरणांसह पेनाची निब” हे पक्षचिन्ह संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाला मिळाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, दि. 09 ऑगस्ट 2022 रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल. याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित ! जय स्वराज्य !”
आनंदवार्ता…!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे… pic.twitter.com/9hzkmXYegJ — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2024