Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्र्यांना मुंबईपेक्षा गडचिरोलीचीच अधिक भुरळ; पालकमंत्रिपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहप्रकल्प व अन्य नव्याने प्रस्तावित प्रकल्पावरून सध्या अनेक मंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 23, 2024 | 03:06 PM
मोठी बातमी! मराठी भाषेबाबात सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये....

मोठी बातमी! मराठी भाषेबाबात सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये....

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली : आतार्यंत कायम उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे आता अवघ्या राज्य मंत्रिमंडळाचे लक्ष लागले आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, मुंबईपेक्षा आता गडचिरोलीची हवा मंत्रिमहोदयांना हवीहवीशी वाटायला लागली आहे. यात महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते अग्रक्रमावर असून, आता कोण आजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. अहेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, असा राजकीय अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, त्यांनाही यावेळी डच्चू देण्यात आला. त्यामुळे आता गडचिरोलीचे पालकत्व कोण स्वीकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहप्रकल्प व अन्य नव्याने प्रस्तावित प्रकल्पावरून सध्या अनेक मंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळले आहे. त्यामुळे हे दोघेच पुन्हा यावर दावा करतात का, याबाबत सध्या जोरदार खलबते सुरू आहेत.

नक्षलवादाशी संबंधित धोके थांबविण्यावर भर

नक्षलवादी लोकांचा राज्यघटनेवरील विश्वास कमी करण्याचा व शहरी भागात पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. नक्षल समर्थकांचे अड्डे उद्ध्वस्त करून त्यांच्या कारवाया थांबवणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. नक्षलवादाशी संबंधित धोका टाळण्यासाठी समितीच्या अहवालानंतर सुधारित मसुदा जुलैच्या अधिवेशनात चर्चेसाठी मांडला जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

समितीमध्ये अनेक सदस्यांचा समावेश

समितीच्या सदस्यांमध्ये राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश केला आहे. त्यात नाना पटोले, जयंत पाटील, रणधीर सावकर, राजेश पाडवी, दीपक केसरकर, रमेश बोरनारे, मनोज कायंदे, मंगेश कुडाळकर, भास्कर जाधव, अनिल पाटील, सिद्धार्थ शिरोळे, मनीषा चौधरी आणि तुषार राठोड यांचा समावेश आहे. विधान परिषदेतून अंबादास दानवे, उमा खरे, विक्रम काळे, मनीषा कायंदे, सतेज पाटील आणि अमित गोरखा यांचा समावेश करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतःही इच्छुक

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागत असल्याचेही सांगण्यात येत आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यातील उद्योग व शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावर प्रत्येकच जण मुंबईपेक्षा गडचिरोलीकडे अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Many ministers interested for guardian minister of gadchiroli nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 03:06 PM

Topics:  

  • Gadchiroli News

संबंधित बातम्या

खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा शासनाला संतप्त सवाल
1

खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा शासनाला संतप्त सवाल

गडचिरोलीत आश्रमशाळेतील 41 विद्यार्थ्यांना विषबाधा; अन्नातून बाधा झाल्याचा संशय
2

गडचिरोलीत आश्रमशाळेतील 41 विद्यार्थ्यांना विषबाधा; अन्नातून बाधा झाल्याचा संशय

गडचिरोलीत मोठा अपघात; घराजवळच उलटला ट्रक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3

गडचिरोलीत मोठा अपघात; घराजवळच उलटला ट्रक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 167 जणांना सर्पदंश, ५ जणांचा मृत्यू
4

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 167 जणांना सर्पदंश, ५ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.