Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….

भीष्मपर्व, द्रोणपर्व संपल्यावर कर्णपर्वाला सुरुवात झाली आणि रणभूमीवर अर्जुन-कर्ण आमने-सामने आले. युद्धिष्ठिराशी झालेल्या वादानंतर श्रीकृष्णाच्या बुद्धीने अर्जुन शांत झाला आणि युद्धभूमीकडे निघाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 04, 2025 | 05:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भीष्मपर्व संपले होते, पाहता पाहता द्रोण पर्वही संपले. कर्णाला कौरवसेनेचा सेनापती म्हणून नेमण्यात आले. पांडवांच्या सैन्याला हरवू शकेल आणि युद्ध आपले नावे करू शकणारा एकाच योद्धा आता कौरवसेनेत शिल्लक होता तो म्हणजे कर्ण! कर्णपर्वाला सुरुवात झाली. दरम्यान, अर्जुनाकडे सारथी म्हणून श्रीकृष्ण आहे म्हणून माझ्याकडेही तसा ज्ञानी आणि हुशार सारथी असणे गरजेचे असल्याचा विचार कर्णाचा होता. कर्णाला सारथी म्हणून राजा शल्य हवा होता पण एका सुतपुत्राचा रथ हाकलण्यासाठी एक राजपुत्र का म्हणून तयार होईल? पण दुर्योधनाच्या कुशल बुद्धीने शल्याला कर्णाचा सारथी म्हणून रणांगणावर पाठवण्यात आले.

Dev Diwali Vrat Katha: 3 राक्षसांसह होता त्रिपुरासुर! असंभव अटीमुळे वध अशक्य, महादेवांच्या एका बाणाने केला सर्वनाश

कर्ण रणांगणावर येताच युद्धिष्ठिर घायाळ झाला. युद्धिष्ठिराला शिबीराकडे नेण्यात आले. श्रीकुष्णाने अर्जुनाला शीघ्र शिबराकडे जाण्याचे उपदेश दिले पण अर्जुन जाण्यास तयार नव्हता पण पांडवसेनेचा नेताच घायाळ होऊन पडलाय त्याला पाहणेही अर्जुनाचे एक महारथी म्हणून कर्तव्य असल्याचे तसेच बंधू म्हणूनदेखील जबाबदारी असल्याचे श्रीकृष्णाने पार्थला सांगितले आणि तो शिबीराकडे रवाना झाला. शिबिरात अर्जुन आलेला पाहून युद्धिष्ठिर भडकला. रागावून अर्जुनाला अगदी घालून पाडून बोलला. अर्जुनाला म्हणाला की “अर्जुना, तू त्या कर्णाला घाबरून इथे आला आहेस ना!” अर्जुनाने त्याला काळजीपोटी अनेक शब्द वापरले तरी युद्धिष्ठिर त्याला काळजी फक्त निमित्त असल्याचे सांगून कर्णाला घाबरूनच अर्जुन शिबिरात आल्याचे म्हणत होता.

अर्जुनाने बराच काळ त्याचे व्यर्थ बोलणे ऐकले पण युधिष्ठीराने शेवटी अर्जुनाच्या नाजूक नसेवर म्हणजेच गांडीव धनुष्यावर नको ते भाष्य केले मग युद्धिष्ठिराला मारण्यासाठी अर्जुनाने म्यानातून तलवारच बाहेर काढली. तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाला अडवले. अर्जुन म्हणाला “माझ्या गांडीव धनुष्याबाबत जो निरर्थक भाष्य करेल, मी त्याचा वध करेल” ही माझी प्रतिज्ञा आहे. तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला मारण्यापेक्षा त्याला एकेरी हाक मारण्याचा सल्ला दिला कारण एका महान पुरुषाचा अपमान हा त्या महान पुरुषासाठी मृत्यूसारखाच असतो. तेव्हा अर्जुन युद्धिष्ठिरावर शाब्दिक वार करण्यास सुरुवात करतो.

तो म्हणतो, “हे युद्धिष्ठिरा, तू जुगारी आहेस. भ्याड आहेस आणि भाग्यहीन आहेस. स्वतः जुगार खेळून आम्हाला विवेकबुद्धी पाजतोयस. मी तुझ्यासाठी स्वतःच्या पितामहांना संपवलं. अनेक महारथींचा वध केला. तू काय केलंस अरे?” जन्मापासूनचा राग अर्जुनाने त्यावेळी काढला. एकार्थी ते सत्यच होतं, महाभारतात युद्धिष्ठिराला नम्र, धार्मिक आणि सत्यवादी दाखवण्यात आले आहे पण द्यूत खेळून सगळंकाही हरणारा युद्धिष्ठिरच होता. स्वयंवरात द्रौपदीला जिंकून अर्जुनाने आणले पण तिलाही द्यूताचा डाव म्हणून लावण्यात युद्धिष्ठिराने मागे पुढे पहिले नाही. गंधर्वांनी जेव्हा दुर्योधनाला बंदी केले तेव्हा स्वतःच्या हक्काचे राज्य पुन्हा मिळवण्याची संधी हातात असतानादेखील युद्धिष्ठिराने अर्जुनाला गंधर्वांच्या तावडीतून दुर्योधनाला सोडवून आणण्याचा आदेश दिला. युद्धिष्ठिर त्या युद्धात जरी पांडवांच्या प्रमुख असला तरी प्रमुख पदाची सगळी धुरा, अर्जुनानेच सांभाळली होती.

Surya Gochar 2025: 16 नोव्हेंबरला होणार सूर्य गोचर, 5 राशींवर होणार कृपा; पद-प्रतिष्ठा-धन वाढून चमकणार भाग्य

अर्जुनाने युद्धिष्ठिराला हे सगळं ऐकवलं आणि पुन्हा म्यानातून तलवार उसळली पण स्वतःला ठार करण्यासाठी कारण भावाचा इतका अपमान त्याने केला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःची स्तुती करायला सांगितली कारण वीर पुरुषांनी स्वतःची स्तुती करणे हादेखील एक मृत्यूचं आहे. तेव्हा अर्जुन स्वतःची स्तुती करून शांत होतो आणि युद्धभूमीवर जाऊन त्या दिव्य लढ्याला ‘कर्ण-अर्जुन’ सुरुवात होते.

Web Title: Arjuna brought sword to kill his elder brother yudhishthira

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

अज्ञातवासात दौप्रदीवर पुन्हा लोटला होता ‘तो’ प्रसंग! अब्रूवर होता निशाणा, कीचकाचा झाला वध
1

अज्ञातवासात दौप्रदीवर पुन्हा लोटला होता ‘तो’ प्रसंग! अब्रूवर होता निशाणा, कीचकाचा झाला वध

महाभारतात टेस्ट ट्यूब बेबी? गांधारीला १०० कौरव नेमके झाले तरी कसे? जाणून घ्या
2

महाभारतात टेस्ट ट्यूब बेबी? गांधारीला १०० कौरव नेमके झाले तरी कसे? जाणून घ्या

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…
3

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.