Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या

काही दिवसात मुलांना आता दिवाळीची सुट्टी सुरु होईल. अशा वेळी पालकांनी मुलांच्या सहवासात राहून चाणक्य नीतीचा अवलंब केला पाहिजे. आपल्या धोरणांमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूबद्दल सांगितले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 20, 2024 | 10:16 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, पण हा कठोरपणा जीवनाचे सत्य आहे. आपल्या व्यस्त जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु हे शब्द आपल्याला जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतील. मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या

चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांनी मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सांगितले आहे. आचार्य म्हणतात की, मूल नवजात झाल्यापासून ते पाच वर्षांचे होईपर्यंत त्याचे खूप लाड केले पाहिजेत. कोणतेही मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याची आईशी ओढ लागते. जन्मानंतर त्याच्या वडिलांकडून. म्हणजे आई-वडिलांपेक्षा जगात मुलाचा चांगला शिक्षक नाही. जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत, त्याचे इतके लाड करा की तो तुमच्या डोळ्यांतून जग पाहू शकेल. त्याचे आईवडील आपल्यावर किती प्रेम करतात हे त्याला कळायला हवे. हे असे वय असते जेव्हा मुले त्यांच्या पालकांच्या नजरेतून जग पाहतात.

हेदेखील वाचा- प्रत्येक घरात मुली का जन्म घेत नाहीत? जाणून घ्या

संस्कार

भारतात संस्कार, मूल्य, परंपरा या गोष्टींना महत्त्व आहे. आपले आयुष्य, जडणघडण, वागणूक या सर्वांवर संस्कारांचा मोठा हातभार असतो. ओल्या मातीला योग्य वयात वळण दिले, तरच ती चांगला आकार देते. ही ओली माती म्हणजे बाल्य दशा. याच वयात मुलांना प्रेम, आपुलकी, राग, लोभ, आदर, नम्रता या गोष्टींचे वळण लावायचे असते.

आज घरोघरी या गोष्टींचा अभाव दिसत आहे. ‘आमचा मुलगा आमचे ऐकत नाही’, ही बाब आजचे पालक हसत हसत सांगतात. परंतु हेच हसू उद्या पाल्य आणि पालकांच्या डोळ्यातले आसू बनतात. यासाठी आचार्य चाणक्य म्हणतात, पुढच्या पिढीच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्यांना योग्य रीतीने घडवणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून काही बाबतीत पथ्य जरूर पाळा.

हेदेखील वाचा- मूलांक 7 असलेल्यांना धनप्राप्ती होण्याची शक्यता

आदर करणे

मुलांना नेहमी प्रत्येकाचा आदर करायला शिकवले पाहिजे. मुलांना गुरू, आई-वडील, वडीलधारे तसेच स्वत:पेक्षा लहान आणि स्वत:पेक्षा कमकुवत असलेल्यांचा आदर करायला शिकवले पाहिजे. इतरांचा आदर करणाऱ्या लोकांना सर्वत्र मान मिळतो आणि अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले जाते. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच लोकांचा आदर करायला शिकवायला हवं.

नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे

व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असणं खूप गरजेचं आहे. मुलं मोठी होत असताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ते आपल्या पालकांना प्रत्येक गोष्टीशी संबंधित प्रश्न विचारत असतात. अशा वेळी पालकांनी संयमाने मुलाच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. असे केल्याने मुलांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा उत्साह कायम राहील.

यशस्वी करणे

चाणक्य नीतीनुसार मुलांना यशस्वी माणूस बनवण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना आज्ञाधारक होण्यास शिकवा. मोठ्यांच्या शब्दांचा आदर करून त्यांचे पालन करावे, मुलांना शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर मुलांना योग्य-अयोग्य शिकवणंही गरजेचं आहे. मोठ्यांच्या चुकीच्या बोलण्यातही मुलांना हो म्हणायला शिकवू नका. चुकीच्या गोष्टीला नाही म्हणणंही गरजेचं आहे.

 

Web Title: Chanakya niti things parents should keep in mind while raising children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 10:16 AM

Topics:  

  • chanakya
  • Chanakya Niti
  • dharm

संबंधित बातम्या

vinayaka chaturthi 2025: नोव्हेंबरमध्ये कधी आहे विनायक चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग आणि भद्रा काळ
1

vinayaka chaturthi 2025: नोव्हेंबरमध्ये कधी आहे विनायक चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग आणि भद्रा काळ

Margashirsha Amavasya 2025: अमावस्येपूर्वी ओळखा ‘हे’ अशुभ संकेत, तुमच्यावर पितरे नाराज तर नाहीत ना?
2

Margashirsha Amavasya 2025: अमावस्येपूर्वी ओळखा ‘हे’ अशुभ संकेत, तुमच्यावर पितरे नाराज तर नाहीत ना?

Zodiac Sign: अमला योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना करिअरमध्ये होईल फायदा
3

Zodiac Sign: अमला योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना करिअरमध्ये होईल फायदा

Numerology: मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numerology: मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.