Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभारतातील मुख्य व्यक्ती जो कौरवांसाठी पांडवांशी लढला ; काय आहे देवव्रताची कहाणी ?

महाभारतील सर्वात अनुभवी योद्धा मानलं जातं. खरंतर कुरुक्षेत्राचा विस्तारच या देवव्रताने केला होता. कुरुसाम्राज्यातील या अनुभवी योद्धाची माहिती जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 19, 2025 | 03:56 PM
महाभारतातील मुख्य व्यक्ती जो कौरवांसाठी पांडवांशी लढला ; काय आहे देवव्रताची कहाणी ?
Follow Us
Close
Follow Us:

महाभारत म्हटलं की कौरव आणि पांडवाचं युद्ध प्रकर्षाने जाणवतं. महाभारतातील युद्ध केवळ सत्तासंघर्ष आहे. सत्ता, प्रतिष्ठेचा मोहापायी अनेक निरपराधांचे बळी गेले होते. या युद्धात कौरवांच्या बाजूने निष्ठेने लढणारे देवव्रत यांना महाभारतील सर्वात अनुभवी योद्धा मानलं जातं. खरंतर कुरुक्षेत्राचा विस्तारच या देवव्रताने केला होता. कुरुसाम्राज्यातील या अनुभवी योद्धाची माहिती जाणून घेऊयात.

हस्थिनापूरचा राजा शांतनू हा मोठा पराक्रमी आणि प्रजेवर अपार प्रेम करणारा होता. हस्थिनापूरात एकदा राक्षसकुळातील सैन्यांची उतमात करायला सुरुवात केली. त्यावेळी याचा प्रजेला मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागला. शांतनू राजाची प्रजा यातनेनं व्हिवळत होती मात्र राक्षसवंशाला कोणत्याही प्रकारे दया माया येत नव्हती. त्यावेळी एक बलदंड बाहूंचा योद्धा राक्षसांना एकटा पुरुन उरला. त्यावेळी राक्षसांनी सांगितलं की भारतवंशीय राक्षसभूमीत येऊन त्रास देतात. त्यावर या योद्ध्याने राक्षसी सैन्य़ाला वचन दिलं की, यापुढे कोणी भारतवंशीय तुमच्या भूमीत येणार नाही तुम्हाला त्रास देणार नाही. या वचनानंतर राक्षसांनी प्रजेला सोडून दिलं. त्यानंर राजा शांतनू हा त्याच्या असंख्य सैन्य़ासह राक्षसांशी युद्ध करण्यास सरसावला. त्यावेळी राक्षस असं पुन्हा करणार नाही असं वचन त्यांनी दिलं आहे त्यामुळे त्यांना सोडून द्यावं असं या योद्धाने राजा शांतनूला सांगितलं. मात्र यावर राजा भडकला.

मला अडवणारा तू कोण? मी या राक्षसांना जाऊ देणार नाही. असं राजा शांतनू त्या योद्धाला म्हणाला. त्यानंतर हा योद्धा राजाला म्हणाला की माता गंगा या राक्षसांना वाट मोकळी करुन देईल. या योद्ध्याने आकाशाच्या दिशेला धनुष्यबाण धरलं त्यानंतर त्याने सुटलेल्या असंख्य बाणांमुळे गंगेचा प्रवाह खंडित झाला आणि वाट मोकळी झाली. माता गंगेने या योद्ध्याचं ऐकल्यानंतर राजा आश्चर्यचकित झाला. त्यावेळी गंगा अवतरली आणि तिने राजाला या योद्धयाची ओळख करुन दिली.

स्वयंवरात द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून का हिणवलं ? हे सूतकुल म्हणजे नक्की काय ?

गंगामाई म्हणाली राजा शांतनू हा योद्धा माझा आणि तुमचा पुत्र देवव्रत आहे. जेव्हा तो य़ुद्धा म्हणून सक्षम होईल तेव्हाच त्याची आणि तुमची भेट होईल आणि झाली आहे. असं म्हणून गंगा अंतर्धन पावली. राजा शांतनूने आपला उत्तराधिकारी म्हणून देवव्रताला राजा म्हणून घोषित केलं. त्यावेळी राजा शांतनूच्या मनात एक वेगळं दुख होतं. राजा शांतनूला मत्सकन्या देवी सत्यवती हिच्यावर प्रेम जडलं होतं. मात्र मी तुमच्या मुलाची सावत्र आई होणार नाही, भविष्यात माझी मुलं सिंहासनावर विराजमान होणार असतील तरच मी विवाह करेन. देवी सत्यवतीची ही अट देवव्रताला कळताचं त्याने गंगेच्या पाण्यात भीष्म प्रतिज्ञा घेतली. त्याने सिंहासन आणि राज्यावरचा आपला हक्क सोडला ते केवळ वडीलांना त्यांचं प्रेम मिळावं यासाठी. मुलाचा त्याग पाहून शांतनू राजाने देवव्रताला इच्छित मरणाचा वर दिला. भीष्म प्रतिज्ञा केल्याने देवव्रताला पुढे भीष्म या नावाने ओळखले जाऊ लागले. पितामह भिष्म यांनी आजन्म ब्रम्हचारी असण्याचं व्रत पाळलं. कुरुक्षेत्राचा विस्तार करण्यात भीष्मांचा मोलाचा वाटा आहे.

Web Title: Pitamah bhishma is real neme devdtta a son of raja shantanu by kurukshetra in mahabharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • Mahabharata war

संबंधित बातम्या

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य
1

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य

Mahabharat Katha: शेवटचा श्वास घेताना दुर्योधनाने श्रीकृष्णाला का दाखवली 3 बोटं? द्वारकाधिशाने काय केले
2

Mahabharat Katha: शेवटचा श्वास घेताना दुर्योधनाने श्रीकृष्णाला का दाखवली 3 बोटं? द्वारकाधिशाने काय केले

Mahabharat: महाभारतातील दानशूर कर्णाचं एकमेव मंदिर; भारतात कुठे आहे माहिती आहे का?
3

Mahabharat: महाभारतातील दानशूर कर्णाचं एकमेव मंदिर; भारतात कुठे आहे माहिती आहे का?

स्वयंवरात द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून का हिणवलं ? हे सूतकुल म्हणजे नक्की काय ?
4

स्वयंवरात द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून का हिणवलं ? हे सूतकुल म्हणजे नक्की काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.