Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरी जगन्नाथ मध्ये असणाऱ्या मुर्त्या अपूर्ण का आहेत? द्वापारयुगातून वाहत आले ते दिव्य हृदय! वाचा संपूर्ण कथा

पुरीतील भगवान जगन्नाथ मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून ते चार प्रमुख धामांपैकी एक मानले जाते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 29, 2025 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेल्या ओडिशा राज्यातील पुरी हे ठिकाण जगभरात आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे. येथे असलेले भगवान जगन्नाथ मंदिर हे केवळ ओडिशाचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान आहे. भगवान जगन्नाथ हे श्रीकृष्णाचे एक रूप मानले जाते. “जगन्नाथ” या नावाचा अर्थ आहे, “जगाचा नाथ” म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी.

Trigrahi Yog: मंगळाच्या राशीमध्ये तयार होत आहे त्रिग्रही योग, या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात होईल लाभ

या मंदिरात भगवान जगन्नाथासोबत त्यांच्या मोठ्या भावाला बलराम आणि बहीण सुभद्रेलाही समान मानाने पूजले जाते. या तिन्ही मूर्तींची पूजा हजारो वर्षांपासून अखंड सुरू आहे. जगन्नाथ मंदिर भारतीय वास्तुकलेचे आणि भक्तिभावाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. पुराणकथेनुसार, द्वारका नगरी समुद्रात बुडाल्यानंतर श्रीकृष्णाचे शरीर नाहीसे झाले, पण त्यांचे हृदय अमर राहिले. ते हृदय लाटांमधून वाहत जाऊन ओडिशाच्या किनाऱ्यावर आले. त्या काळात ओडिशावर राजा इंद्रद्युम्न राज्य करत होते. राजा अतिशय भक्त आणि धर्मनिष्ठ होते. एके रात्री त्यांना स्वप्नात भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले “राजा, माझे दैवी रूप या जगात पुन्हा प्रकट होणार आहे. तू समुद्रकिनारी मिळालेल्या माझ्या हृदयासारख्या तेजस्वी वस्तूला मंदिरात स्थान दे आणि माझी मूर्ती बनव.”

राजा इंद्रद्युम्न हे आदेश ऐकून आनंदित झाले आणि त्यांनी तात्काळ मंदिर उभारण्याचे काम सुरू केले. मात्र, जेव्हा मूर्ती घडवण्याचा प्रश्न आला, तेव्हा कुणालाही ते काम करण्याचे धैर्य होत नव्हते. तेव्हा विश्वकर्मा देव, जे देवांचे कारागीर मानले जातात, मानवाच्या रूपात राजाकडे आले आणि म्हणाले, “मी ही मूर्ती तयार करीन, पण एक अट आहेजेव्हा मी काम करत असेन, तेव्हा कोणीही दरवाजा उघडू नये. जर उघडला, तर मी अदृश्य होईन आणि मूर्ती अपूर्ण राहील.”

राजाने अट मान्य केली. विश्वकर्मा देवाने काम सुरू केले. अनेक दिवस आवाज ऐकू येत होतामूर्तीवर घाव घालण्याचा, सुतारकामाचा. पण काही दिवसांनी आवाज थांबला. राणीला आणि राजाला काळजी वाटू लागली की, काही अनर्थ तर घडला नाही ना? अखेरीस राजा आपले संयम गमावतो आणि दरवाजा उघडतो. तो क्षणच निर्णायक ठरतो. विश्वकर्मा देव अदृश्य होतात आणि मूर्ती अपूर्ण राहतात. मूर्तींना हातपाय नसतात, आकार अर्धवट असतो. राजाला खूप पश्चात्ताप होतो, पण त्याच वेळी आकाशातून आवाज येतो “हे राजा, हीच माझी खरी मूर्ती आहे. अपूर्ण असली तरी ती भक्तांच्या प्रेमाने पूर्ण होईल.”

त्या क्षणापासून त्या मूर्तींची पूजा सुरू झाली आणि त्या मूर्ती म्हणजे आजचे भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा आहेत.

पुरीतील जगन्नाथ मंदिराची उभारणी इ.स.पूर्व काळात झाल्याचे मानले जाते. राजा इंद्रद्युम्न यांनी या मंदिराचे बांधकाम केले आणि ते चार धामांपैकी एक मानले जाते (इतर तीन आहेत द्वारका, बद्रीनाथ आणि रामेश्वरम). मंदिराची उंची सुमारे २०० फूट असून, ते जगातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक आहे.

या मंदिरात देवांच्या मूर्ती दर १२ वर्षांनी “नवकलेबर” नावाच्या विधीद्वारे बदलल्या जातात. म्हणजे, जुनी लाकडी मूर्ती विसर्जित केली जाते आणि नवीन मूर्ती त्याच स्वरूपात बनवली जाते. या प्रक्रियेला अत्यंत गूढ आणि पवित्र मानले जाते.

“स्वर्ग: एक ग्रह!” जेव्हा भगवान शंकर अर्जुनाला स्वर्गात जाण्यास सांगतात… पण स्वर्ग नक्की आहे तरी कुठे? वाचा

पुरी जगन्नाथ मंदिराचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही जाती, धर्म, पंथातील लोक देवदर्शनासाठी येऊ शकतात. भगवान जगन्नाथ म्हणजे “सर्वांचा नाथ” कोणावरही भेदभाव न करणारा देव. जगन्नाथाची पूजा केवळ हिंदू धर्मापुरती मर्यादित नसून, बौद्ध आणि जैन परंपरांमध्येही या देवतेचा उल्लेख आढळतो. भगवान जगन्नाथाच्या अन्नछत्रालाही (अन्न प्रसाद) विशेष स्थान आहे. येथे दररोज हजारो भक्तांना प्रसाद दिला जातो, आणि असे मानले जाते की या स्वयंपाकघरातील अन्न कधीही संपत नाही. हेही एक दैवी रहस्य मानले जाते.

Web Title: Puri jagannath statues are not completely builed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 04:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.