Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे टिळक, पण पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे कोण?

सध्या देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. सगळीकडे गरबा आणि दुर्गा देवीचा जागर केला जात आहे. पण तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव कधी आणि कोणी साजरा केला? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 09, 2024 | 05:48 PM
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे टिळक, पण पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे कोण?

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे टिळक, पण पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे कोण?

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव साजरा केल्यानंतर अनेकांना वेध लागले ते नवरात्रीचे. ज्याप्रमाणे गणेशोत्सवात एक चैतन्यमय वातावरण निर्माण होते तसेच वातावरण आपल्याला नवरात्रीत सुद्धा पाहायला मिळते. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात आपण सर्वांनीच वाचले आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. पण तुम्हाला सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात कोणी केली याबद्दल माहीत आहे का चला आज आपण त्या थोर व्यक्तीबद्दल जाणून घेऊया.

पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारी व्यक्ती

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत, हे आपण सर्वेच जाणतो. या शिवसेनेची स्थापना 50 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. याच बाळासाहेबांच्या वडिलांनी म्हणजेच केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनीच महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला. आणि त्यांच्या मदतीला होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

हे देखील वाचा: ‘ती’चा सन्मान फक्त 9 दिवस? विचारांची अस्पृश्यता आजही कायम, शक्तीचे रूप दाखविण्याची गरज

कसा सुरु झाला पहिला नवरात्रोत्सव?

आपण सर्वेच जाणतो की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनी केली होती. यामागचे उद्दिष्ट सर्व धर्मातील लोकांना एकत्रित करणे होते. पुढे गणेशोत्सव एक मोठा सण साजरा होऊ लागला, ज्यात उच्चवर्णीय समुदायाचे वर्चस्व जास्त होते. यातील काही कर्मठ लोकं दलितांना गणरायाचे दर्शन घेण्यास येऊ देत नव्हते. यामुळे प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक राव बहादूर सीताराम केशव बोले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणेतर लोकांना सुद्धा गणरायाला पुजण्यास द्यावे अशी मागणी केली. हा गणेशोत्सव दादरमध्ये साजरा केलं जात होता.

नेहमीप्रमाणे या कर्मठ लोकांनी त्यांची मागणी अमान्य केली. यानंतर प्रबोधनकारांनी एक कडक पवित्र घेतला ज्यानंतर एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार डॉ. आंबेडकरांचे निकटवर्तीय गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा यांनी आपल्याकडील फुलं ब्राह्मण पुरोहितास देईल. यानंतर ही फुलं गणरायाला अर्पण केले जाईल.

या घटना पुढे वाढू नये म्हणून कर्मठ व धर्मांध लोकांनी दादरमधील सार्वजनिक गणेशोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला. आता लोकांना एकत्रित करण्यासाठी एका मोठ्या सणाचा आधार घेणे महत्वाचे होते. अशावेळी प्रबोधनकारांनी महाराष्ट्र आणि छत्रपती शिवरायांची कुलदेवता तुळजापूरच्या देवीला अग्रस्थानी ठेऊन नवरात्रोत्सव हा सण निवडला.

नवरात्रीतून बहुजनांची एकता

जातीभेदाच्या कचाट्यात सापडलेल्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी 1926 साली मुंबईतल्या दादरमध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी दादरमधील प्लाझा सिनेमासमोर एक मोकळे मैदान होते ज्याला लोकं काळं मैदान म्हणून ओळखायचे. याचा मैदानात महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज हेच मैदान वीर कोतवाल उद्यान म्हणून ओळखले जाते. पुढे कालांतराने हा उत्सव दादरमधील खांडके चाळीत साजरा होऊ लागला व आजही तो सुरु आहे.

या नवरात्रोत्सवाची खास बाब म्हणजे सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना संबोधित केले होते. आज जर तुम्ही या दादरमधील खांडके चाळीतील नवरात्रोत्सवाला भेट दिली तर तुम्हाला देवीची सुंदर व शाडू मातीने बनलेली मूर्ती पाहायला मिळेल.

Web Title: The story behind the maharashtras first ever sarvajanik navratrotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Navratri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.