Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-चीनमधील संबंधांमध्ये थोडी सुधारणा; LAC करारावर अजूनही वाद- एस. जयशंकर

India-China LAC Agreement: भारत-चीन LAC करारामध्ये अजूनही तणाव आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवरील तणाव आणि त्यावरील उपाययोजना याबाबत संसदेत सविस्तर माहिती दिली.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2024 | 05:37 PM
भारत-चीनमधील संबंधांमध्ये थोडी सुधारणा; LAC करारावर अजूनही वाद- एस. जयशंकर

भारत-चीनमधील संबंधांमध्ये थोडी सुधारणा; LAC करारावर अजूनही वाद- एस. जयशंकर

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत-चीन LAC करारामध्ये अजूनही तणाव आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवरील तणाव आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मंगळवारी संसदेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारत आणि चीन सीमावाद कूटनीती व चर्चा यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे. पूर्व लडाखमधील काही भागांत तणाव कमी झाला असला तरी अद्याप काही भागांवर वाद कायम आहे. भारताचा उद्देश असा तोडगा काढण्याचा आहे, जो दोन्ही देशांना मान्य असेल.

2020 मध्ये गलवानमध्ये चीन-भारताच्या सैन्यांमध्ये संघर्ष

2020 मध्ये गलवान येथील हिंसक संघर्षानंतर भारत-चीन संबंध सामान्य राहिलेले नाहीत. त्या घटनेने द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांत तणाव कमी करण्यासाठी अनेक बैठकांची मालिका सुरू झाली होती. परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे की, 2020 पासून आजवर दोन्ही देशांदरम्यान विविध स्तरांवर 38 बैठका झाल्या. वर्किंग मेकॅनिझम फॉर कोऑर्डिनेशन (WMCC) आणि वरिष्ठ सैन्य अधिकारी समिती (SHMC) यांच्या माध्यमातून सातत्याने चर्चा सुरू होती. याच प्रक्रियेतून ऑक्टोबर 2024 मध्ये देपसांग आणि डेमचोक भागांवरील वादावर तोडगा निघाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारत एक प्रयोगशाळा…’, बिल गेट्स यांचे वादग्रस्त विधान; सोशल मीडियावर टिकांचा भडिमार

एस. जयशंकर यांनी संगितले की, भारत-चीन मध्ये सध्या 75% वाद सोडवण्यात येतील. त्यांनी म्हटले आहे की, चीनसोबत सीमेवरील सैन्याच्या माघारीशिवाय अजूनही अनेक मुद्यांवर भारतासमोर आव्हाने आहे. चीनसोबतचा भारतास इतिहास अडणींचा आहे. LAC करारा वाद झाला असला तरी करोना महामारीच्या काळात चीनने सीमवेर सैनिक तैनात करुन उल्लंघन केले होते. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यात अनेक संघर्ष झाले. यामुळे दोन्ही देशांत अजून तणाव वाढला.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

भारत-चीन सीमेवरील तणाव सोडवण्यासाठी 1988 पासून विविध करार

गलवान संघर्षाने भारताला मोठा धक्का दिला. 1962 च्या युद्धानंतर प्रथमच सीमेवर सैनिकांचे प्राण गेले. 2020 मध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करून भारताच्या गस्तीत अडथळा निर्माण केला होता. मात्र, भारतीय सैन्याने या आव्हानांचा खंबीरपणे सामना केला. सीमेवरील तणाव सोडवण्यासाठी 1988 पासून विविध करार झाले. 1993, 1996 आणि 2005 मधील करारांत शांतता व विश्वास निर्माण करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या.

भारत-चीन सीमेवरील वाद अजूनही कायम

मात्र, चीनच्या वर्तनामुळे हे करार अपयशी ठरले. चीनने अक्साई चीनमधील 38,000 चौरस किलोमीटर भारतीय भूभाग व्यापला आहे, तर पाकिस्तानने 1963 मध्ये 5,180 चौरस किलोमीटर जमीन चीनला हस्तांतरित केली होती. सध्या, भारत-चीन सीमेवरील सैन्य पूर्वीच्या स्थितीत परतले आहे. नवीन पेट्रोलिंग करारांमुळे सीमावाद कमी करण्यास आणि गलवानसारख्या घटना टाळण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सौदी अरेबियाच्या ‘या’ नियमाचा लाखो भारतीयांना होणार फायदा; रोजगार मिळण्यास येणार नाही अडचण

Web Title: S jaishankar on india chin lac agreement says their still dispute nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 05:37 PM

Topics:  

  • China
  • india
  • world

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.