
Shanghai airport detained an Indian-origin woman for 18 hours claiming Arunachal Pradesh is China
Indian woman harassed at Shanghai airport : चीन (China) आणि भारतातील (India) सीमावाद पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. अरुणाचल प्रदेश वंशाच्या ब्रिटनस्थित भारतीय महिलेने धक्कादायक आरोप केला आहे की शांघाय पुडोंग विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला तब्बल 18 तास ताब्यात ठेवून मानसिक छळ केला. कारण तिच्या पासपोर्टवर जन्मस्थान अरुणाचल प्रदेश नमूद होते आणि अधिकाऱ्यांनी “अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे” असा दावा केला.
पीमा वांगजोम थोंगडोक 21 नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानकडे प्रवास करत असताना शांघाय येथे तीन तासांच्या ट्रान्झिटसाठी उतरल्या होत्या. परंतु इमिग्रेशन काउंटरवरील अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट पाहताक्षणी तो “अवैध” असल्याचे घोषित केले.
जेव्हा त्यांनी कारण विचारले तेव्हा अधिकाऱ्यांनी तिखट उत्तर दिले,
“अरुणाचल चीनचा भाग आहे, त्यामुळे हा भारतीय पासपोर्ट वैध नाही.”
पीमाच्या म्हणण्यानुसार, चीनमधील इमिग्रेशन कर्मचाऱ्यांनी केवळ पासपोर्ट अवैध ठरवला नाही तर त्यांच्या ओळखीची थट्टा केली आणि “चिनी पासपोर्ट घ्या!” अशी चेष्टा देखील केली.
𝐀𝐫𝐮𝐧𝐚𝐜𝐡𝐚𝐥 𝐢𝐬 𝐩𝐚𝐫𝐭 𝐨𝐟 𝐂𝐡𝐢𝐧𝐚: 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐰𝐨𝐦𝐚𝐧 ‘𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐬𝐞𝐝’ 𝐚𝐭 𝐒𝐡𝐚𝐧𝐠𝐡𝐚𝐢 𝐚𝐢𝐫𝐩𝐨𝐫𝐭 An Indian-origin UK resident from #ArunachalPradesh has accused Chinese immigration officials at the #Shanghai airport of detaining and harassing her… pic.twitter.com/X96cZ2sEX1 — IndiaToday (@IndiaToday) November 24, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप
एक साधी ट्रान्झिट प्रक्रिया एका भयानक अनुभवात बदलली. पीमा सांगतात की त्यांना:
सगळे नाकारण्यात आले.
तसेच त्यांचा व्हिसा वैध असतानाही त्यांना पुढील फ्लाइटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्याकडून वारंवार नवीन तिकीट खरेदी करण्याचा दबाव आणला जात होता. त्यामुळे त्यांच्या प्रवासात आणि हॉटेल बुकिंगमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
तासन्तास अडकून राहिल्यानंतर पीमा यशस्वीपणे शांघायमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधू शकल्या. भारतीय अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून रात्री उशिरा त्यांना दुसऱ्या फ्लाइटने रवाना करण्यात आले.
पीमा यांनी हा संपूर्ण प्रकार भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अरुणाचल प्रदेशातील नागरिकांचा अपमान असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून:
मागणी केली आहे.
Ans: कारण महिलेच्या पासपोर्टवर जन्मस्थान अरुणाचल प्रदेश नमूद होते.
Ans: तब्बल 18 तास.
Ans: भारतीय दूतावासाने हस्तक्षेप करून तिला फ्लाइटने पाठवले, आणि पुढील कारवाईची मागणी आहे.