Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव शिगेला; भारत-पाकिस्तानने संयम बाळगावा, संयुक्त राष्ट्र महासचिवांचे आवाहन

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 25, 2025 | 05:30 PM
UN chief urges India Pakistan to stay calm after Pahalgam attack

UN chief urges India Pakistan to stay calm after Pahalgam attack

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना शांततेचा मार्ग स्वीकारत, जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.

२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅली, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक नेपाळी नागरिकही होता, तर इतर बहुतांश जण पर्यटक होते. या अमानुष हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, भारताने त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेत सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

संयुक्त राष्ट्रांचा ठाम संदेश, शांततापूर्ण संवादच पर्याय

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महासचिव गुटेरेस यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, दोन्ही देशांनी कोणतीही उत्तेजक किंवा परिस्थिती चिघळवणारी कृती टाळावी, असे मत नोंदवले आहे. “नागरिकांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत मान्य नाहीत,” असे स्पष्ट करत महासचिवांनी शांतता आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली. त्यांनी असेही नमूद केले की, भारत आणि पाकिस्तानमधील कोणताही वाद फक्त शांततामय संवादानेच सुटू शकतो, आणि त्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर आदर, संयम आणि कूटनीतीचा मार्ग अवलंबावा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: काउंटडाउन सुरू! फक्त 7 दिवसांत भारत उचलणार पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल

सिंधू पाणी करारावरून नव्या संघर्षाची शक्यता

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देताना सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने याला तातडीने प्रतिक्रिया देत, “हे पाऊल युद्धाला चिथावणी देणारे ठरेल,” असा इशारा दिला. यावर संयुक्त राष्ट्रांनी पुन्हा एकदा संयम राखण्याचे आवाहन केले असून, तणाववाढीला कारणीभूत ठरणारी कोणतीही कारवाई टाळावी, असे स्पष्ट केले आहे.संयुक्त राष्ट्र महासभेचे ७९ वे अध्यक्ष फिलेमोन यांग यांनी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले की, “ही घटना मानवतेच्या मूलभूत मूल्यांना हादरवणारी आहे.”

United Nations asks India and Pakistan to have maximum restraint after the Pahalgam terror attack.

Are you serious, UN?

Enough of this sermon. Enough of being a mute spectator. Enough of wearing blinkers towards terrorism. UN has failed to put efforts to end Pakistani terror. pic.twitter.com/QgWXwAw6dn

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 24, 2025

credit : social media

भारताचे स्पष्ट धोरण, दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता

संयुक्त राष्ट्रात आयोजित ‘भविष्यातील डिजिटल नागरिकांचे सक्षमीकरण’ या विशेष कार्यक्रमाच्या सुरुवातीला, केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद, भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश, तसेच अनेक जागतिक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

पी. हरीश म्हणाले की, “या अमानुष हल्ल्यात झालेली जीवित आणि मालमत्तेची हानी ही अत्यंत दुर्दैवी असून, भारत याचा तीव्र निषेध करतो.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर न्यू यॉर्क टाईम्सचा वादग्रस्त अहवाल; अमेरिकन समितीकडून तीव्र प्रतिक्रिया

 शांततेचा मार्गच पर्याय

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी संयुक्त राष्ट्रांनी दिलेले संयमाचे आणि संवादाचे आवाहन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांनी शांततेवर घाला घातला असला तरी, प्रतिकार आणि संरक्षण याबरोबरच शांततापूर्ण मार्गाने विवाद मिटवणे हे जागतिक हितासाठी आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सूचनेचा कितपत परिणाम होतो हे येत्या काळात दिसून येईल, मात्र पहलगाममधील शहीद झालेल्या निष्पाप जीवांनी पुन्हा एकदा जागतिक नेतृत्वाला शांततेचा मार्ग शोधण्याची निकड अधोरेखित करून दिली आहे.

Web Title: Un chief urges india pakistan to stay calm after pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान
2

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?
3

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
4

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.