Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर

पुन्हा एकदा लिपुलेखवरुन भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरु झाला आहे. परंतु हा मार्ग भारतासाठी आणि चीनसाठी अत्यंत महत्वाच आहे. याचे कारण आपण सविस्तर जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 23, 2025 | 09:21 PM
why Lipulekh Pass important for India Know in detail

why Lipulekh Pass important for India Know in detail

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि चीनमध्ये सीमाव्यापारावर सहमती झाली असून यासाठी लिपुलेख खिंडीचा मार्ग निवडण्यात आला आहे. पण नेपाळने याला तीव्र विरोध केला आहे. याला भारताने प्रत्युत्तर देत १९५४ पासून हा व्यापार सुरु असल्याचे म्हटले आहे. पण भारतासाठी ही खिंड इतकी महत्वाची का आहे? आणि भारत आणि नेपाळमध्ये यावरुन वाद का सुरु आहे? हे आज या लेखातून आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

लिपुलेख

लिपुलेख खिंड हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये ५ हजार ११५ मीटर उचींवर आहे. येथे भारत, चीन आणि नेपाळच्या सीमा येऊन मिळतात यामुळे याला त्रिकोणी जंक्शन म्हटले जाते. गेल्या अनेक काळापासून हा या भागातून भारत व्यापार करतो. तसेच कैलास मानसरोवरच्या यात्रेकरुंसाठी ही खिंड महत्वाची आहे. भारतासाठी याचे धोरणात्मक, धार्मिक आणि आर्थिक महत्व फार आहे.

लिपुलेखवरुन भारत नेपाळमध्ये पुन्हा ठिणगी; केपी ओली शर्मा यांनी चीनसोबतच्या व्यापार करावर घेतला आक्षेप

काय आहे नेमका वाद?

१८१६ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळमध्ये सुगौली करार करण्यात आला होता. याअंतर्गत काली नदी भारत-नेपाळ सीमा म्हणून निश्चित करण्यात आली होती.  पण नेपाळच्या मते, काली नदी लिपुलेख खिंडीतून उगम पावते, म्हणजेच कालापानी आणि लिंपियाधुरा हे नेपाळचे भाग आहेत.

नेपाळने दावा केला आहे की, ब्रिटीश काळात या सीमा चुकीच्या पद्धधतीने निश्चित करण्यात आल्या. परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे.

भारताने दावा फेटाळला

भारताने सुरुवातीपासून हा दावा फेटाळला असून भारताच्या मते, काली नदी कालापाणी गावाजवळ उगम पावते. १८७९ च्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या नकाशात कालापाणी हा भाग भारताचा दाखवण्यात आला आहे.

या नकाशानुसार, कालापाणी परिसर १८३० पासून अधिकृतरित्या भारताचा भाग आहे. यामुळे भारत नेपाळचे दावे फेटाळत आला आहे. तसेच १९५४ पासून भारत आणि चीनमध्ये या भागातून व्यापार केला जातो, यामुळेही भारताने नेपाळचे दावे फेटाळले आहे.

भारतासाठी का महत्वाची आहे लिपुलेख खिंड?

भारतासाठी लिपुलेख मार्ग हा धोरणात्मक, आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोमनातून महत्वाचा आहे. हे कसे ते आता आपण समजून घेऊयात.

धोरणात्मक महत्व

  • लिपुलेख खिंड उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यात भारत – चीन सीमेवर आहे.
  • याभागातून भारताला थेट तिबेटमध्ये प्रवेश करता येतो.
  • तसेच येथे भारताने २०२० मध्ये ८० किलोमीटरचा रस्ता बांधला आहे, ज्यामुळे भारताचा प्रवास कैलास सरोवरसाठी दोन-तीन दिवसांपूर्यंत कमी झाला आहे.
  • लडाखमधील चीनसोबतच्या तणावनंतर या मार्गाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.

धार्मिक महत्व

  • लिपुलेख कैलास मानसरोवर यात्रेसाठी प्रमुख मार्ग आहे.
  • कैलास मानसरोवर यात्रा ही हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माच्या लोकांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते.
  • तसेच या भागात उत्तराखंड सरकारने जुना लिपुलेख खिंड विकसित केला आहे, ज्यामुळे कैलास पर्वताचे दर्शन घडते.
  • यामुळे लोकांना तीर्थयात्रा अधिक आकर्षक आणि सोपी झाली आहे.

आर्थिक महत्व

  • लिपुलेख मार्गे भारत आणि चीनमध्ये १९५४ पासून पांरपारिक व्यापार सुरु आहे.
  • १९६२ च्या युद्धानंतर हा व्यापार थांबला होता. पण २०२५ मध्ये दोन्ही देशांनी पुन्हा सुरु करण्यास सहमती दर्शवली.
  • नुकतेच १८ ऑगस्ट २०२५ रोजी चीनचे परराष्ट्र मत्री वांग यी यांनी भारत भेटीनंतर हा मार्ग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण यावर नेपाळने तीव्र विरोध केला आहे. शिवाय यामध्ये चीनचाही मोठा स्वार्थ आहे. येथून चीन आणि भारतमधील अंतर कमी आहे. हे चीनसाठी भू-राजकीय, धोरणात्मक आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहे. चीन आणि भारतामझील युद्धादरम्यान हा मार्ग बंद झाला होताच परंतु याचा वापर करुन चीन भारतावर दबाव आणण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांना याचे फायदे आहेत.

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

Web Title: Why lipulekh pass important for india know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • nepal

संबंधित बातम्या

लिपुलेखवरुन भारत नेपाळमध्ये पुन्हा ठिणगी; केपी ओली शर्मा यांनी चीनसोबतच्या व्यापार करावर घेतला आक्षेप
1

लिपुलेखवरुन भारत नेपाळमध्ये पुन्हा ठिणगी; केपी ओली शर्मा यांनी चीनसोबतच्या व्यापार करावर घेतला आक्षेप

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत
2

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

चीनला नाकाला झोंबणार मिर्च्या? आणखी एका शेजारी देशाच्या पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर येणार
3

चीनला नाकाला झोंबणार मिर्च्या? आणखी एका शेजारी देशाच्या पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर येणार

‘लोकशाही नाही तर नेपाळमध्ये आता राजेशाहीची गरज’, आंदोलनादरम्यान अभिनेत्री मनिषा कोईराच्या मागणीने खळबळ
4

‘लोकशाही नाही तर नेपाळमध्ये आता राजेशाहीची गरज’, आंदोलनादरम्यान अभिनेत्री मनिषा कोईराच्या मागणीने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.