Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…आता 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत मिळणार; केंद्राकडून अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता!

केंद्र सरकारकडून देशातील १७ कोटी कुटुंबांना मोठा दिलासा दिला जाणार आहे. सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आगामी अर्थसंकल्पात आता ५ लाखांऐवजी १० लाख रुपयांपर्यंतचा इलाज देशातील कोणत्याही दवाखान्यात मोफत मिळणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 18, 2024 | 06:13 PM
...आता 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत मिळणार; केंद्राकडून अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता!

...आता 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत मिळणार; केंद्राकडून अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे. याबाबतची तारीख देखील केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. अशातच आता या अर्थसंकल्पात सरकारचा फोकस आरोग्यसेवेवर राहण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून देशातील जवळपास १७ कोटी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थसंकल्पात आयुष्यमान भारत या योजनेची मर्यादा दुप्पट केली जाण्याची शक्यता आहे. अर्थात देशभरातील सर्व गरीब कुटुंबांना आता ५ लाखांऐवजी १० लाखांचा मोफत इलाज मिळू शकणार आहे. याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे आयुष्यमान भारत योजना?

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये तिची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमधून देशभरातील लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते.

का वाढणार योजनेच्या खर्चाची मर्यादा?

आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला देशातील जवळपास १२ कोटी नागरिकांना ५ लाखांपर्यंतचा इलाज मोफत मिळतो. देशातील कोणत्याही सरकारी आणि खासगी दवाखान्यात सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेचा फायदा मिळतो. सरकारी सूत्रांच्या माहीतीनुसार वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे योजनेचे खर्च मर्यादा डबल करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे आता आयुष्यमान भारत योजनेची मर्यादा डबल झाल्यास, १० लाखांपर्यंतचा वैद्यकीय इलाज मोफत मिळणार आहे.

सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत खर्चाची रक्कम दुप्पट केल्यास, सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार आहे. अर्थात केंद्र सरकारने 10 लाखांपर्यंत मोफत मर्यादा वाढवल्यास योजनेच्या वार्षिक खर्चात 12,076 कोटी रुपये वाढ होणार आहे. ज्यामुळे सरकारच्या तिजोरीवर त्याचा परिणाम होणार आहे. यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात योजनेसाठी 7,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ज्यात आता यावेळी 12 हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे. परिणामी, आता केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात योजनेसाठी एकूण 19 हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद करावी लागणार आहे.

Web Title: Hospital treatment up to 10 lakhs will be free possibility of big announcement in the budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Ayushman Bharat Yojana
  • Budget 2024
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, आता ‘आयुष्मान कार्ड’ साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ‘असं’ झटपट मोबाईलवरच होईल काम
1

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, आता ‘आयुष्मान कार्ड’ साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ‘असं’ झटपट मोबाईलवरच होईल काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.