
सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी प्रकरणी सुनावणी संपली; वाचा... काय म्हटलंय न्यायालयाने?
गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. नीट-यूजी परीक्षेतील अनियमितता आणि ती रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात ४० हुन अधिक याचिकांवर आज (ता.२२) सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी सुनावणी झाली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे.
काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने?
नीट परिक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळाले होते. त्यामुळे 4.2 लाख उमेदवारांचे नुकसान झाल्याने, न्यायालयाने यावर आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे, असे आपल्या सुनावणीत नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी दिल्लीच्या संचालकांना 3 तज्ज्ञांची टीम तयार करून, या विषयावर अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान, आता उद्याही या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ पदांसाठी भरती; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!
आजही नाही झाली अंतिम सुनावणी
आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र, असे आज काही घडले नाही. उद्या देखील न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यापूर्वी मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी गेल्या तीन सुनावणीमध्ये २२ जुलै रोजी याप्रकरणी अंतिम सुनावणी जाहीर केली जाईल, असे म्हटले होते. मात्र,आता नीट परीक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने, 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळाले होते. याप्रकरणी आता आयआयटी दिल्लीच्या संचालकांसह तीन जणांची समिती स्थापन करून, याबाबत २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अंतिम उत्तर देण्याची मागणी करण्यात आली आहे.