Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशी होती आधीची गुरुकुल प्रणाली! भारतीय शिक्षणाचा खरा आत्मा

गुरुकुल प्रणाली ही प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती होती, जिथे विद्यार्थी गुरुच्या आश्रमात राहून केवळ ज्ञानच नाही, तर शिस्त, आत्मसंयम आणि समाजसेवेचे मूल्येही शिकत असत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 19, 2025 | 06:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि आदर्श शिक्षणपद्धती म्हणजे गुरुकुल प्रणाली. ही पद्धत केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी होती. ‘गुरु’ आणि ‘कुल’ या दोन शब्दांपासून ‘गुरुकुल’ हा शब्द बनलेला आहे म्हणजे गुरुच्या आश्रमात राहून शिक्षण घेण्याची व्यवस्था. येथे विद्यार्थी केवळ शास्त्र, वेद, गणित किंवा युद्धकला शिकत नसत, तर त्यांना शिस्त, विनम्रता, आत्मसंयम, कर्तव्यबुद्धी आणि समाजसेवेचे मूल्य शिकवले जात असे.

मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते ‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन! ‘महाराष्ट्रातील संगीत वाद्ये’ विषयावर प्रकाश

गुरुकुलामध्ये शिक्षण पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात दिले जाई. विद्यार्थी जंगलातील आश्रमात राहत आणि गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत. त्या काळात कोणतेही शाळा-कॉलेज नव्हते; गुरुंचे आश्रमच शिक्षणसंस्था मानल्या जात. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी समाजातील कोणत्याही वर्गातून येऊ शकत. राजा असो वा शेतकऱ्याचा मुलगा सर्व विद्यार्थी समान पद्धतीने शिकत आणि गुरुंच्या आज्ञांचे पालन करत. ही प्रणाली समतेचा, साधेपणाचा आणि आत्मनिर्भरतेचा उत्कृष्ट नमुना होती.

गुरुकुलातील शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे शिकवले जात जसे की अन्न शिजवणे, शेती करणे, प्राण्यांची सेवा करणे, तसेच आत्मसंयम आणि ध्यान करण्याचे प्रशिक्षण दिले जाई. शिक्षण हे गुरू-शिष्य नात्याच्या भावनिक नात्यावर आधारलेले होते. गुरूंच्या सेवेत राहून विद्यार्थी त्यांच्या कृतीतून शिकत आणि त्यांच्या वर्तनातून जीवनमूल्य आत्मसात करत.

मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते ‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन! ‘महाराष्ट्रातील संगीत वाद्ये’ विषयावर प्रकाश

कालांतराने गुरुकुल पद्धतीवर परकीय आक्रमण, औपनिवेशिक शिक्षण आणि आधुनिक शालेय प्रणालींचा प्रभाव पडून ती हळूहळू नष्ट झाली. तरीही आजच्या काळातही तिचे महत्त्व कमी झालेले नाही. आज अनेक शैक्षणिक संस्था गुरुकुल पद्धतीतील मूल्यांवर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक संस्कार यांचा समन्वय साधत, पुन्हा एकदा भारतीय शिक्षणातील आत्मा पुनर्जिवित करण्याचे कार्य सुरू आहे.

गुरुकुल प्रणाली ही फक्त शिक्षणपद्धती नव्हती ती जीवनशैली, संस्कारसंस्था आणि मानवी मूल्यांची शाळा होती. म्हणूनच ती आजही भारतीय परंपरेचा आणि संस्कृतीचा सर्वात सुंदर वारसा मानली जाते.

Web Title: How was the ancient guru kul system of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

राज्यातील १८ हजार शाळांवर संकट कायम, शिक्षकांचे 25 हजार पदे अतिरिक्त
1

राज्यातील १८ हजार शाळांवर संकट कायम, शिक्षकांचे 25 हजार पदे अतिरिक्त

December School Holidays: डिसेंबरमध्ये मजेत राहणार मुलं, मिळणार बंपर सुट्ट्या; यादी वाचून बनवा Vacation Plan
2

December School Holidays: डिसेंबरमध्ये मजेत राहणार मुलं, मिळणार बंपर सुट्ट्या; यादी वाचून बनवा Vacation Plan

TET पेपरफुटीचे प्रकरण; ९ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, SIT चौकशीची मागणी
3

TET पेपरफुटीचे प्रकरण; ९ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, SIT चौकशीची मागणी

शिक्षक भरती व पदनियुक्ती पटसंख्येनुसारच होणार; हायकोर्टाने वैध ठरवला ‘तो’ निर्णय, अतिरिक्त शिक्षकांना…
4

शिक्षक भरती व पदनियुक्ती पटसंख्येनुसारच होणार; हायकोर्टाने वैध ठरवला ‘तो’ निर्णय, अतिरिक्त शिक्षकांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.