वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले. वरिष्ठ वेतनश्रेणीचा सुमारे १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा फरक काढून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच…
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात. यामध्ये प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा २ लाख ८९ हजार ६०९ बालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
Dharashiv जिल्ह्यातील ७ शाळांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण गावातच मिळणार आहे.
शिक्षण विभागाने ‘शाळा आपल्या दारी’ मोहीम राबवत प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या उपक्रमातून शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पावले उचलली जात आहेत.
कला शाखेकडे वळत नाहीत. कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे करिअरचे मर्यादित पर्याय असतात, असे अनेकांचं मानणं आहे. पण हे चुकीचं आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय की ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे.
12 वी नंतर काय करावे? कोणत्या कोर्सची निवड करावी? याबाबत तुमच्या मनात देखील गोंधळ निर्माण झाला आहे का? चिंता करू नका. आता आम्ही तुम्हाला काही कोर्सबद्दल सांगणार आहोत.
राज्यातील शिक्षकांवर वाढत असलेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे नाराजी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘स्कॉफ’ अॅपद्वारे माहिती भरण्याची सक्ती केल्याने शिक्षक संतप्त झाले आहेत.
मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील संधींचा आत्मविश्वासाने स्वीकार करून स्वतःची क्षमता विकसित करावी.
कॉलेजची फी, वसतिगृह आणि पुस्तकांच्या विचाराने अनेक घरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पण चांगली बातमी अशी आहे की, सरकारने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक अतिशय विशेष योजना सुरू केली आहे.
राष्ट्रीय लष्करी शाळा (RMS) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. या शाळा थेट संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात आणि विद्यार्थ्यांना भावी लष्करी अधिकारी बनण्यासाठी तयार करतात.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थिनींच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये 'मासिक पाळी आरोग्य केंद्र' उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आले आहे. गुलाबराव खरात यांच्या आदेशाने १२ शिक्षकांसह एकूण १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा २१ मार्च रोजी लोकभवन, मुंबई येथे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून C. P. Radhakrishnan उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या हिवाळी २०२५ टप्पा ४ परीक्षांना २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. १० एप्रिल २०२६ पर्यंत चालणाऱ्या या परीक्षांत सुमारे ४३,९२८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
Education Director Killed : पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिराजवळ, पलूस) यांचा अज्ञातांनी निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस…
राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. शाळांमध्ये मराठी शिकवली जात नसल्यास तक्रार आल्यावर सरकारकडून तत्काळ चौकशी केली जाणार आहे.
आतापर्यंत आठवीपर्यंतच शिक्षणाची सुविधा उपलब्ध होती. या पार्श्वभूमीवर ऐनवाडी येथील शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग विशेष बाब म्हणून सुरू करण्याचे आदेश दिले जाणार.