Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

महाराष्ट्रातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा यंदा 5 ते 25 एप्रिलदरम्यान एकाचवेळी घेतली जाणार आहे. शाळांना निकाल प्रक्रियेसाठी कमी वेळ मिळणार असल्याने 1 मे रोजी निकाल जाहीर करण्यासाठी मोठी कसरत!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 18, 2025 | 05:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2024-25 हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात असून राज्यातील बहुतांश शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू झाली आहे. अनेक शाळांमध्ये तोंडी परीक्षा घेतल्या जात आहेत, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही तयारीत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत वार्षिक परीक्षा म्हणजेच फायनल परीक्षा कधी होणार याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी फ्री AI कोर्सेस; फोर्ब्सने जाहीर केली लिस्ट

यंदा राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. याआधी या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतल्या जात होत्या, मात्र यावर्षी सर्वच शाळांमध्ये परीक्षा एकाच कालावधीत पार पडणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याबाबत आदेश जारी केले असून त्यानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, कारण शिक्षणाधिकारी किंवा ‘डायट’ (DIET) मार्फत कधीही त्यांची तपासणी केली जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा 5 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी शाळा त्यांच्या सोयीनुसार परीक्षा घेत असत, त्यामुळे काही शाळांमध्ये परीक्षांचा कालावधी वेगवेगळा असे. मात्र यंदा सर्वच शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने विद्यार्थी 25 एप्रिलपर्यंत शाळेत उपस्थित राहतील. परीक्षेनंतर थेट उन्हाळी सुट्टी सुरू होईल, मात्र मुख्याध्यापकांसाठी निकाल प्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.

यंदा निकाल 1 मे रोजी घोषित केला जाणार आहे. निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षक आणि शाळांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे निकाल 1 मे पर्यंत तयार करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तातडीने करावे लागेल. त्यामुळे शिक्षकांसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Narcotics Control Bureau विभागात इन्स्पेक्टर पदी होणार नियुक्ती; मग वाट कसली पाहताय? आजच करा अर्ज

या नव्या प्रणालीमुळे राज्यभरातील शाळांमध्ये एकसमान परीक्षा प्रणाली लागू होईल. विद्यार्थ्यांना याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. मात्र, परीक्षा एकाच कालावधीत झाल्यामुळे शाळांना निकाल प्रक्रियेत वेग वाढवावी लागणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांनी वेळापत्रकानुसार तयारी करणे आवश्यक आहे.

Web Title: Important news for students of class 1 to 9 in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात
1

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य
2

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

‘एनईपी’नुसार बदलणार अभ्यासक्रम! दुसऱ्या वर्गापासून पाठ्यपुस्तक बदलाची सुरुवात
3

‘एनईपी’नुसार बदलणार अभ्यासक्रम! दुसऱ्या वर्गापासून पाठ्यपुस्तक बदलाची सुरुवात

RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी
4

RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.