Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kargil War Letters: कारगिल युद्धादरम्यान सैनिकांची ती शेवटची पत्रे जी वाचून तुमचे डोळे पाणावतील! जाणून घ्या त्या भावनांचा प्रवास..

Kargil War Letters: कारगिल युद्धादरम्यान सैनिकांनी घरच्यांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रांचा भावूक इतिहास जाणून घ्या. कॅप्टन विजयंत थापर आणि कॅप्टन मनोज पांडे यांच्या पत्रांची गाथा एकदा वाचाच.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 26, 2026 | 03:43 PM
kargil letter

kargil letter

Follow Us
Follow Us:

Kargil War Letters: वर्ष १९९९… कारगिलच्या बर्फाच्छादित शिखरांवर एका बाजूने गोळ्यांचा वर्षाव होत होता, तर दुसरीकडे काही सैनिक आपल्या बॅगमधून कागद आणि पेन काढून घरच्यांच्या नावावर पत्रे लिहीत होते. त्या पत्रांमध्ये युद्ध जिंकण्याचा जोश नव्हता किंवा वीरतेचे प्रदर्शनही नव्हते. त्यामध्ये आईच्या हातचे जेवण, वडिलांच्या अपेक्षा, पत्नीचे हसू आणि मुलांच्या सुवर्ण भविष्याबद्दलच्या गोष्टी होत्या. अनेकांना कदाचित जाणीव होती की हे त्यांचे शेवटचे पत्रही असू शकते. काही पत्रे घरापर्यंत पोहोचली, काही टपाल पिशव्यांमध्येच राहिली आणि काही हुतात्म्यांच्या सामानामध्ये सापडली.

या पत्रांमध्ये नेमके काय लिहिले जायचे?

कारगिलदरम्यान लिहिल्या गेलेल्या पत्रांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही सैनिकाने स्वतःला नायक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. ते स्वतःच्या शूरपणाचे नव्हे, तर घरच्यांची चिंता कमी करण्याचा प्रयत्न करत असत. एखाद्या पत्रात आईला स्वतःची काळजी घेण्याविषयी असते, तर कुणात वडिलांच्या स्वप्नांचा उल्लेख असे.

पत्नीला हिंमत ठेवण्याची आणि मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही या पत्रांमध्ये मिळे. या शब्दांमध्ये युद्धाची भीती नव्हे, तर कुटुंबाप्रती प्रेम आणि जबाबदारी दिसून येते. म्हणूनच आजही ही पत्रे केवळ कागद नसून सैनिकांच्या भावनांचे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज मानले जातात.

कॅप्टन विजयंत थापर यांचे पत्र आजही का स्मरले जाते?

कारगिल युद्धातील सर्वात भावूक कागदपत्रांमध्ये कॅप्टन विजयंत थापर यांच्या शेवटच्या पत्राचे नाव सर्वात वर येते. हे पत्र जेव्हा घरच्यांच्या हातात पोहोचेल, तेव्हा कदाचित ते या जगतात नसतील, असे त्यांनी आपल्या पालकांना लिहिले होते. त्यांनी कुटुंबाला दुःखी न होण्याचे आणि देशासाठी असलेल्या कर्तव्याचा अभिमान बाळगण्याचे म्हटले होते. याच पत्रात त्यांनी काश्मीरमधील रुखसाना नावाच्या एका मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंतीही केली होती. हे पत्र केवळ एका सैनिकाचा शेवटचा संदेश नव्हता, तर मानवता, संवेदनशीलता आणि देशभक्तीचे असे उदाहरण होते, जे युद्धाच्या क्रूरतेतही मानवता जिवंत ठेवते.

कॅप्टन मनोज पांडे यांच्यासारखे सैनिक काय विचार करत असत?

परमवीर चक्र विजेते कॅप्टन मनोज कुमार पांडे देखील बऱ्याचदा आपल्या घरी पत्रे लिहीत असत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, ते आपल्या पत्रांमध्ये कधीही स्वतःच्या पराक्रमाचा उल्लेख करत नसत. घरच्यांना त्रास होऊ नये, ही त्यांची सर्वात मोठी चिंता असायची. कदाचित प्रत्येक सैनिकाला माहीत होते की खरी लढाई फक्त सीमेवर नाही, तर घराच्या आतही चालू असते, जिथे कुटुंब दररोज चिंता आणि अनिश्चिततेमध्ये जगत असते. याच कारणामुळे सैनिक आपल्या पत्रात नेहमी सकारात्मक गोष्टी लिहीत असत, जेणेकरून त्यांच्या जिव्हाळ्याची माणसे खंबीर राहतील. या पत्रांनी कुटुंबांना आशा आणि धैर्य दोन्ही दिले.

NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..

हुतात्म्यानंतर मिळालेली पत्रे किती वेदनादायी होती?

कारगिल युद्धात शहीद झालेल्या अनेक सैनिकांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, मुलाच्या हुतात्म्याची बातमी आल्यानंतरही अनेक दिवस टपालखात्याचे कर्मचारी त्यांच्या नावांची पत्रे घेऊन येत असत. जेव्हा ती पत्रे लिहिली गेली होती, तेव्हा सैनिक जिवंत होते, पण जेव्हा ती वाचली गेली, तेव्हा ते कायमचे निघून गेले होते. अनेक पत्रे सैनिकांच्या बॅग, खिशात किंवा जॅकेटमध्ये सापडली, जी कधी पोस्टच केली जाऊ शकली नाहीत. काही पत्रे अपूर्ण राहिली. कुठे फक्त “प्रिय आई…” लिहून पेन थांबले, तर कुठे शाई पसरली किंवा रक्ताचे डाग पडले. ही अपूर्ण पत्रे आजही युद्धाच्या सर्वात वेदनादायी आठवणींमध्ये समाविष्ट आहेत.

कारगिलची ही शेवटची पत्रे आजही का जिवंत आहेत?

२६ जुलै १९९९ रोजी भारताने कारगिल युद्ध जिंकून शत्रूचा कट उधळून लावला. कोणती टेकडी कधी जिंकली आणि किती सैनिक शहीद झाले, हे लष्कराच्या नोंदीवरून समजते; पण त्या टेकड्यांवर उभा असलेला जवान अखेरच्या क्षणी कोणाला आठवत होता, हे या पत्रांवरून कळते. युद्धानंतर अनेक कुटुंबांनी ही पत्रे फ्रेम करून घरात लावली, तर काहींनी ती जुन्या पेट्यांमध्ये आजही जपून ठेवली आहेत.

AI Startup Program: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे का? मग ही बातमी लगेच वाचा..

या पत्रांमध्ये लिहिलेले “मी लवकरच परतेन, स्वतःची काळजी घे” हे शब्द आजही वाचणाऱ्यांचे डोळे ओले करतात. कारगिल विजय दिनी जेव्हा संपूर्ण देश हुतात्म्यांना नमन करतो, तेव्हा या शेवटच्या पत्रांची आठवण काढणे तितकेच महत्त्वाचे ठरते, कारण या शब्दांमध्ये त्या वीर जवानांचे अपूर्ण स्वप्न आणि अमर प्रेम कायमची जिवंत आहे.

Web Title: Kargil war letters soldiers emotional history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • army
  • Kargil Vijay Diwas
  • letters

संबंधित बातम्या

Ex Agniveer CAPF Recruitment: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सीएपीएफ भरतीत ५०% आरक्षण देणार?
1

Ex Agniveer CAPF Recruitment: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सीएपीएफ भरतीत ५०% आरक्षण देणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.