
फोटो सौजन्य - Social Media
राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. राज्यभरात परीक्षेचे वातावरण आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून दहावी तसेच बारावी बोर्ड परीक्षा राबवण्यात येत आहेत. अशामध्ये एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यभरातील एकूण १०७ परीक्षा केंद्रांना कुलूप लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. तसेच राज्यभरातील इतर सर्व परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षेदरम्यान पारदर्शकता टिकून राहील व अजून नव्याने मजबूत होऊन आपल्या समोर येईल.
आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील आमदार काशिनाथ दाते यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यासंबंधित अभ्यास करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ झाली आहे, कारण चक्क राज्यातील 107 परीक्षा केंद्रांना बंद करण्याचा महत्वाची घोषणा देण्यात आली आहे तसेच राज्यभरात प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे बसवण्यात येतील, जेणेकरून कॉपी या प्रकाराला मुळापासून बंद करता येईल.
राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असताना राज्यातील एका परीक्षा केंद्रावर चक्क सामूहिक कॉपी निदर्शनास आली. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईदेखील करण्यात आली. असे अनेक कॉपीचे प्रकरण समोर येत असताना, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यासंबंधित कठोर पाऊले उचलत राज्यात परीक्षा केंद्रावर पारदर्शकता कशी ठेवता येईल? यावर जोर दिले असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या वर्षात एकूण १६,१४,९८७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी पात्र आहेत. राज्यभरातील एकूण ५,१११ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होत्या. २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीदरम्यान परीक्षा घेण्यात येत आहे. तर एकूण १,५२,८६२ विद्यार्थी यंदा बारावीच्या परीक्षेसाठी पात्र आहेत. राज्यभरातील एकूण ३,३८७ परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होणार!