Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाणिज्य क्षेत्रातून आहात? बारावीनंतर काय? जाणून घ्या, करिअरसंबंधित अतिशय महत्वपूर्ण माहिती

वाणिज्य क्षेत्रातून असाल तर एक ही बातमी नक्की वाचा. बारावी नंतर नक्की करायचे काय? असा प्रश्न जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याला येतो. काही करिअर ऑप्शन आहेत, त्यांची निवड केल्यास उत्तम ठरते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2025 | 01:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

देशभरात दहावी बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. अशामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या भविष्या बद्दल अनेक प्रश्न तयार झाले असतील. दहावी तसेच बारावीनंतर विद्यार्थी गोंधळात असतात. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकं आपण कोणत्या मार्गाने जायला हवे? यात विद्यार्थ्यांचे विचार गुंतलेले असतात. बारावीच्या नंतर उमेदवार कॉमर्स क्षेत्रातील उमेदवार कोणत्या क्षेत्रात गेले की त्यांना उत्तम पगाराची नोकरी मिळेल? चला तर मग जाणून घेऊयात.

पुण्यात सरकारी नोकरीच्या शोधात आहात? PMCची बंपर भरती; ताबडतोब करा अर्ज

चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) अनेक वाणिज्य विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही वाणिज्य क्षेत्रामध्ये एक तद्न्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला ऑडिटिंग आणि टॅक्स प्लॅनिंग तसेच वित्त व्यवस्थापन यांसारख्या महत्वाच्या संकल्पनांचे प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स आव्हानात्मक मानला जातो, पण जर तुम्ही मेहनतीने अभ्यास केला तर मोठ्या आर्थिक संस्थांमध्ये, नामांकित कंपन्यांमध्ये किंवा स्वतंत्र प्रॅक्टिससाठी स्वतःला तयार करू शकता. हा कोर्स ICAI (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया) मार्फत दिला जातो आणि त्याचे विविध स्तर असतात. हे सर्व स्तर उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही प्रमाणित चार्टर्ड अकाउंटंट बनता.

बीकॉम भारतातील अतिशय सामान्य कोर्स आहे. वाणिज्य क्षेत्रातील बहुतेक विद्यार्थी B.Com ची निवड करतात. एकूण तीन वर्षांचा हा कोर्स आहे. यामध्ये फायनान्स, अकाउंटिंग आणि टॅक्सेशनसंबंधित विषय शिकवले जातात. ज्यांना अकाउंटिंग, फायनान्स किंवा व्यवसाय क्षेत्रात रस आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. बीकॉम केल्यानंतर विद्यार्थी CA, CS किंवा MBA सारखे उच्च शिक्षण घेऊ शकतात, जे करिअरच्या दृष्टीने अधिक संधी निर्माण करू शकते.

कर्नाटकात सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस सुरू; विद्यार्थिनींना मिळणार तंत्रज्ञान कौशल्यांचे प्रशिक्षण

ज्यांना व्यवसाय व्यवस्थापन (बिझनेस मॅनेजमेंट) क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी BBA हा सर्वोत्तम कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाची संपूर्ण समज दिली जाते. आंतरराष्ट्रीय व्यापार (इंटरनॅशनल बिझनेस), मानवी संसाधन (ह्यूमन रिसोर्सेस) आणि विपणन (मार्केटिंग) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो. बीबीए केल्यानंतर विद्यार्थी MBA सारखा उच्च अभ्यासक्रम करू शकतात, जो चांगल्या करिअरच्या संधी आणि उच्च पगाराच्या नोकरीस मदत करू शकतो. जर तुम्ही वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थी आहात तर नक्कीच या क्षेत्रांचा विचार करा आणि वाणिज्य क्षेत्रात मोठी भरारी घ्या. पुढे या क्षेत्रात मास्टर्स ही करू शकता आणि मोठ्या पदावर काम करू शकता.

Web Title: What to do after 12th in the field of commerce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Commerce
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Mumbai University Exam Rules: परीक्षेच्या ३० मिनिटे आधी परीक्षा कक्षात पोहोचणे अनिवार्य; २०२६-२७ पासून नवा नियम
1

Mumbai University Exam Rules: परीक्षेच्या ३० मिनिटे आधी परीक्षा कक्षात पोहोचणे अनिवार्य; २०२६-२७ पासून नवा नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.