Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये चार अल्पवयीन मुलींचा विषारी पदार्थ सेवनाने संशयास्पद मृत्यू; पाचवी बचावली, नेमके कारण काय?

बिहारच्या औरंगाबादमध्ये विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर चार अल्पवयीन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पाचवी मुलगी बचावली असून, तिच्या जबाबामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 01, 2026 | 10:54 AM
बिहारमध्ये चार अल्पवयीन मुलींचा विषारी पदार्थ सेवनाने संशयास्पद मृत्यू; पाचवी बचावली, नेमके कारण काय?

बिहारमध्ये चार अल्पवयीन मुलींचा विषारी पदार्थ सेवनाने संशयास्पद मृत्यू; पाचवी बचावली, नेमके कारण काय?

Follow Us
Follow Us:
  • औरंगाबादमधील पाच अल्पवयीन मुलींनी केले विषारी पदार्थ सेवन
  • पाचव्या मुलीच्या जबाबातून मिळाली धक्कादायक माहिती
  • मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच
UP Crme News: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच अल्पवयीन मुलींनी विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर चौघींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचवी मुलगी बचावली असून, तिच्या जबाबावरून या घटनेमागील नेमके कारण समोर आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी हसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. मात्र, घटनेची माहिती पोलिसांना काही दिवसांनी मिळाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

पाच मुली शेतात गेल्या आणि चौघींचा मृत्यू
पाचही मुलींचे वय साधारण १० ते १४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे कळाले आहे. त्या एकत्र शेताकडे गेल्या होत्या. तेथे त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचे समोर आले. त्यानंतर चौघींची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. पाचवी मुलगी मात्र घरी परतली. तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलीच्या जबाबातून मिळाली वेगळीच माहिती
त्या संकटातु वाचलेल्या मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणींनी विषारी पदार्थाबाबत उत्सुकतेतून तो सेवन करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या म्हणण्यानुसार, इतर मुलींनी पदार्थ पाण्यासोबत घेतला; मात्र तिने अगदी कमी प्रमाणात घेतल्यानंतर तो थुंकून टाकला. त्यामुळे तिचा जीव वाचल्याचे तिने सांगितले. तिच्या कुटुंबीयांनीही तातडीने उलटी होण्यासाठी घरगुती उपचार केल्याचे समजले आहे.

मात्र पोलिसांच्या तपासात वेगळा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागे वेगळे कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सरस्वतीपूजेच्या दिवशी मुली काही मुलांसोबत फिरताना दिसल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रागावल्याचे आणि त्यातून त्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बचावलेल्या मुलीच्या जबाबावरून समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तपास अद्याप सुरू असून या कारणाला अंतिम निष्कर्ष मानता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अंत्यसंस्कारानंतर पोलिसांना मिळाली माहिती
या घटनेतील सर्वांत गंभीर बाब म्हणजे चौघी मुलींचे अंत्यसंस्कार घटनेच्या दिवशीच करण्यात आले. त्यावेळी पोलिसांना याची माहिती देण्यात आली नव्हती. स्थानिक माध्यमांतून घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे मृतदेहांचे शवविच्छेदनही होऊ शकले नाही. घटनेचे नेमके कारण आणि विषारी पदार्थ कोठून मिळाला, याचा तपास आता केला जात आहे.

कुटुंबीयांचा वेगळाच दावा
मृत मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कथित कारणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुली खेळण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या आणि नंतर त्या शेतात मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे या घटनेमागे नेमके काय घडले, याबाबत अजूनही अस्पष्टताच आहे.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून विविध शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. बचावलेल्या मुलीचा जबाब, स्थानिक नागरिकांची माहिती आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे घटनेचे सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे चार अल्पवयीन मुलींच्या मृत्यूमागचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Suspicious deaths of four minor girls in bihar after consuming a poisonous substance a fifth girl survivedwhat is the exact cause

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 10:54 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.