मनोज जरांगे पाटील यांची विधान निवडणुकीतून माघार, अर्ज मागे घेण्याचा उमेदवारांना सूचना (फोटो सौजन्य-X)
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे परिणाम राज्यातील लोकसभा निवडणुकीत दिसले आले. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतच काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र आता निवडणूक लढवणार नाही, पण उमेदवारी पाडणार असे म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोमवारी (4 नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. एकाच जातीवर निवडणूक कसं लढवणार,एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही. मराठा समाजातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरंगे यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा: चिपळूणमध्ये महाविकास आघाडी प्रचार फेरीचा शुभारंभ; विजयासाठी कालभैरवाच्या चरणी साकडं
काल समाजबांधवासी मतदारसंघावर सविस्तर चर्चा झाली. पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती. मित्रपक्षांची यादी अजून आलेली नाही. एका जातीवर निवडून येणं कसं शक्य आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
याला पाड,त्याला पाड म्हणायची इच्छा नाही, पण मला खवळलं तर बघू, दोन्ही शहाणे नाहीत.तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडणू आणा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी माघार घेतानाच मराठा समाजाला मोठा मेसेजही दिला. त्याशिवाय याला माघार म्हणता येणार नाही. हा गणिमी कावा आहे. असं देखील म्हणाले.
तसेच “निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरू होणार आहे. आपल्या मागण्या त्यामाध्यमातून पूर्ण करू. आपल्याला निवडणूक लढायची नाही. सगळे पाडायचे, असं मराठा समाजातील बांधवांचं मत होते. कुणीही नाराज होण्याचं काम नये,” असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं.
हे सुद्धा वाचा: चिपळूणमध्ये महाविकास आघाडी प्रचार फेरीचा शुभारंभ; विजयासाठी कालभैरवाच्या चरणी साकडं