
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्याने पोस्टमध्ये नमूद केले की…
वैभव मांगले यांनी त्यांच्या Facebook Handle वरून पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “हे ‘मराठी’ कलाकार हिंदीत चमकले, चमकत आहेत किंवा चमकतील, याचं फालतू कोडकौतुक आधी बंद केलं पाहिजे. तिथे चमकलं म्हणजे आपणच भारी कलाकार आहोत का? हा पूर्ण बिनडोकपणा आहे. आम्ही इथे काम करतो, इथले लोक आमच्यावर प्रेम करतात. हिंदीत नाव कमावलं म्हणून मराठी रसिक कुणाला विशेष मान देत नाहीत आणि तिथेही कुणी मराठी कलाकारांना हिरो किंवा हिरोईन म्हणून घेत नाही. बहुतांश वेळा मराठी पार्श्वभूमी असलेल्या भूमिकाच दिल्या जातात. Madhuri Dixit आणि Nana Patekar यांना सोडले, तर फार कुणाला तिथे खरी किंमत दिली जात नाही. मराठी कलाकारांना ‘घाटी’ म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या मनात आपल्या कलाकारांविषयी एक प्रकारचा आकस आहे. मराठी कलाकारांना कधीच योग्य मान मिळाला नाही. म्हणजे आमचं कमी अस्सल आणि तेच अव्वल, अशी ही फालतुगिरी आहे. Prashant Damle, Umesh Kamat, Priya Bapat, Bharat Jadhav, Mukta Barve, Nirmiti Sawant, Makarand Anaspure, Prasad Oak, Spruha Joshi यांसारखे कलाकार अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मोठे कलाकार आहेत. धन्यवाद”.
Trollers ला आधीच दिले उत्तर…
वैभव मांगलेंच्या या पोस्टने चर्चेची पालवी फुटली आहे. तसेच पोस्टच्या शेवटी त्यांनी नमूद केले आहे की, “आता काही महाभाग असं म्हणतील की, ‘याला कुणी काम दिलं नाही म्हणून हे बोलतोय.’ पण त्यांना सांगून ठेवतो, मला त्या इंडस्ट्रीचं कधीच आकर्षण वाटलं नाही. तिथे काही केलं तरच आपण भारी आहोत, असंही मला कधी वाटलं नाही.”
चाहत्यांनी केले समर्थन…
वैभव मांगलेंच्या चाहत्यांनीही हिंदी सिनेसृष्टीच्या या कृत्याविषयी राग व्यक्त केला आहे. तसेच अनेकांचे म्हणणे आहे की “याआधीही आमच्या मराठी सिनेविश्वात अनेक अष्टपैलू कलाकार झाले. त्यापैकी अनेकांनी हिंदी सिनेमात कामही केले. परंतु, त्यांना अनेकदा Side Role दिले किंवा घरगड्याचं काम देण्यात आलं.”