Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेत लष्कराचे १० जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. तसंच येथील हेलिपॅड पूर्णपणे मलब्यात गायब झाल असून लष्करी छावणीचंही नुकसान झालं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Aug 05, 2025 | 09:01 PM
उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० सैनिक बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान

उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० सैनिक बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. हर्षिलवळील धराली गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड मलबा वाहून आला आणि या मलब्यात शेकडो घरं गाडली गेली आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात हाहाकार माजला. ही घटना भारतीय लष्कराच्या कॅम्पपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर घडली असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर गावावर कोसळली दरड, २० सेकंदात सर्वकाही उदध्वस्त

गंगोत्री धामचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. पावसाचे पाणी आणि डोंगरावरून आलेला मलबा इतक्या वेगात खाली आला की, संपूर्ण धराली गाव पाण्याखाली गेले. बाजारपेठा, हॉटेल्स, वाहने, घरे – सगळं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं. “अशी आपत्ती मी याआधी कधीच पाहिली नव्हती. सगळं काही क्षणात नष्ट झालं, असं एका प्रत्यक्षदर्शिने सांगितलं.

ही दुर्घटना खीरगंगा परिसरात सात तालाजवळ हर्शिला पर्वतीय भागात घडली. धराली हे गाव उजव्या बाजूला असून, डाव्या बाजूला हर्षिलच्या तेलगाड भागात लष्कराचं कॅम्प आहे. या भागात त्यावेळी २०० हून अधिक स्थानिक आणि पर्यटक उपस्थित होते.

या नैसर्गिक संकटात भारतीय लष्कराचाही मोठा फटका बसला आहे. हर्षिलमधील १४ राजरिफ युनिटच्या कॅम्पला पुराचा फटका बसला असून, १० जवान आणि एक जेसीओ अद्याप बेपत्ता आहेत. एक अधिकारी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या आपत्तीतही लष्कराचे अधिकारी आणि जवान बचावकार्यात सहभागी झाले असून, आतापर्यंत त्यांनी १५ जणांचे प्राण वाचवले आहेत. याबाबत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.

या भागात नदीकिनारी असलेले हेलीपॅड देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे, ज्यामुळे हेलिकॉप्टरमार्फत मदत कार्य करणे अशक्य झाले आहे. उत्तरकाशीहून धरालीकडे येणाऱ्या मार्गावर नेतला भागात भूस्खलन झाल्याने रस्ते बंद झाले आहेत आणि बाह्य मदत पोहोचणं अत्यंत कठीण बनलं आहे.

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त

एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिस, लष्कर आणि अन्य आपत्कालीन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. खीरगड नाल्याच्या पूरामुळे परिसरात आणखी नुकसान झाले असून, सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेले लष्कराचे जवान मदतकार्य करत आहेत.सध्या पूर्ण परिसरात मदतकार्यात अडथळे येत असून हवामानही साथ देत नाही. मात्र सर्व यंत्रणा याठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. हर्षिल आणि धराली परिसरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: 10 army jawan missing helipad destroy in uttarkashi cloudburst latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 08:56 PM

Topics:  

  • Landslide News
  • Uttarakashi
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Uttarakhand News – २२ वर्षांची बी.टेक पदवीधर साक्षी बनली तरुण सरपंच; कुई गावाच्या शेती व पाणी समस्यांवर मोठे निर्णय
1

Uttarakhand News – २२ वर्षांची बी.टेक पदवीधर साक्षी बनली तरुण सरपंच; कुई गावाच्या शेती व पाणी समस्यांवर मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.