Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केदारनाथ, बद्रीनाथ प्रसादामध्ये भेसळ तर नाही? तिरुपतीच्या प्रसाद वादावरुन उत्तराखंड सरकार अलर्ट मोडवर!

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. नमुना चाचणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकार अलर्टमोड वर आले आहे. सर्व प्रमुख मंदिरांमध्ये मिळणाऱ्या प्रसादाची चाचणी होणार असून भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 25, 2024 | 12:56 PM
uttarakhand government tested kedarnath Badrinath prasad

uttarakhand government tested kedarnath Badrinath prasad

Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंड : देशामध्ये सध्या तिरुपती बालाजीच्या प्रसादावरुन रान उठले आहे. प्रसादामध्ये माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचे समोर आल्यानंतर भाविकांनी रोष व्यक्त केला. प्रसादासारख्या पवित्र पदार्थामध्ये देखील भेसळ समोर आल्यामुळे देशभरामध्ये या प्रकरणावर चर्चा रंगल्या आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय देखील जागे झाले. मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर बनावट मिठाई आणि भेसळयुक्त तूप व खवा बनवणाऱ्या जागांवर छापेमारी करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळापूर्वी हे भेसळयुक्त मिठाई बनवण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न समोर आला आहे. आता तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादातील धक्कादायक भेसळ समोर आल्यानंतर उत्तराखंड प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे.

अन्न व औषध प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त एफडीए ताजबर सिंग जग्गी यांनी मंगळवारी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधून अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अन्न सुरक्षा विभागाला उत्तराखंडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मिठाई, तूप आणि बटरचे नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून सुरू झालेली कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. राज्यातील सर्व ब्रँड देशी तूप, लोणी आणि मिठाईमध्ये भेसळ आहे की नाही याची चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रसाद आणि मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना चाचणी करुन तपासले जाणार आहे.

उत्तराखंड सरकार घेणार काळजी

त्याचबरोबर उत्तराखंडमधील प्रमुख मंदिराच्या प्रसादाची चाचणी केली जाणार आहे. याबाबत उत्तराखंडचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी निर्णय घेतला असून माहिती दिली आहे. या चाचण्यांमध्ये  केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम, गंगोत्री धाम, यमुनोत्री धाम आणि इतर मंदिरांसारख्या राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये प्रसादाचा नमुना घेण्यात येणार आहे. देशभरातून लाखो भाविक या मंदिरांना भेटी देत असतात. त्यामुळे आता तिरुपतीनंतर उत्तराखंडमधील मंदिरांमध्ये वाटण्यात येणारा प्रसाद हा पूर्णपणे शुद्ध आणि धार्मिक श्रद्धेनुसार असल्याची खात्री सरकारकडून करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : भारत प्रथमच बनला आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश; सुपर पॉवर रशिया आणि जपानलाही मागे टाकले

भविष्यात वाद होऊ नये म्हणून चाचणी…

उत्तराखंडचे सांस्कृतिक मंत्री सतपाल म्हणाले की, “उत्तराखंडमध्ये हिंदू धर्मातील अनेक प्रमुख मंदिरं असून लाखो भाविक दरवर्षी येत असतात. त्यामुळे सर्व प्रमुख मंदिरांमध्ये बनवलेल्या आणि वाटण्यात येणाऱ्या प्रसादाचे नमुने घेण्यात येणार आहेत. मंदिरांमधून नमुने गोळा करून त्यांची चाचणी करण्यासाठी विशेष पथके तयार केली जाणार आहेत. या चाचणीमध्ये प्रसादाची सामग्री, त्याची गुणवत्ता आणि धार्मिक नियमांचे पालन यावर विशेष लक्ष दिले जाईल. आमच्या राज्यात भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. भाविकांच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी असून याची आम्ही काळजी घेत आहोत,” असे मत उत्तराखंडच्या मंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: After tirumala prasad controversy uttarakhand temple committee tightens rules in state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • Badrinath Dham
  • Kedarnath

संबंधित बातम्या

Kedarnath disaster 2013 : आता 3075 लोकांच्या मृत्यूचा लागणार छडा? 12 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार मानवी सांगाड्यांचा शोध
1

Kedarnath disaster 2013 : आता 3075 लोकांच्या मृत्यूचा लागणार छडा? 12 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार मानवी सांगाड्यांचा शोध

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक; हायवे बंद अन्…; पहा Video
2

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक; हायवे बंद अन्…; पहा Video

केदारनाथवरून आल्यावर लावावं लागलं सलाइन, अमृता खानविलकरची बिघडली तब्येत!
3

केदारनाथवरून आल्यावर लावावं लागलं सलाइन, अमृता खानविलकरची बिघडली तब्येत!

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज
4

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.