Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

मी खुली पत्रकार परिषद घेतली. पण माझ्या पत्रकार परिषदेवर भाजपच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही. मोदी-शाहांनी एक शब्द नाही काढला, जेव्हा चोर पकडला जातो. तेव्हा तो पूर्णपणे शांत होतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2025 | 11:52 AM
Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत;  प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

Bihar News:  बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी आणि आरजेडी नेते नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मीती करताना दिसत आहे. काल बिहारमधील मधुबनी येथे राहुल-तेजस्वी यांची मतदार हक्क यात्रा पोहचली. या यात्रेचा ताफा जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा इंडिया आघाडीचे नेतेही या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. नेत्यांच्या सामील होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे राजकारणही तापले आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या मतदार हक्क यात्रेत भाग घेतला.

ययावेळी जनतेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. भाजपने देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले आहेत. प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आणि म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते की जर काँग्रेसचे लोक सत्तेत आले तर ते मंगळसूत्र, म्हशी चोरतील, पण म्हशी विसरून जा, त्यांनी तुमची मते चोरली. जर तुम्ही मतदान करण्याची शक्ती गमावली तर समजून घ्या की रेशन कार्डसह सर्व योजनांमधून तुमचा हक्क काढून घेतला जाईल. म्हणून मत चोरी होऊ देऊ नका.” असे म्हणत प्रियंका गांधींनी थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Garh Ganesh Temple Jaipur : जयपूरच्या ‘या’ मंदिरात पत्र लिहून मागितली जाती इच्छा, जाणून घ्या जगावेगळ्या प्रथेमागचं रहस्य

तर, राहुल गांधी यांनी अमित शाह आणि जातीय जनगणनेबाबत भाष्य केलं. मागील काही काळापासून अमित शाह सातत्याने ‘भाजप देशात पुढचे ५० वर्षे सत्तेत राहिल,’ असा दावा करत आहेत. अमित शाहा यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘अमित शाहांचे हे विधान खूपच विचित्र आहे. मला कायम प्रश्न पडायचा, यांना कसं माहिती ४-५० वर्षे हे सत्तेत राहतील. पण आता सत्य देशासमोर आले आहे की हे सरकार जनतेच्या मतांची चोरी करत आहे. केंद्रातील मोदी सरकार तुमची मते चोरून, लोकांचे रेशनकार्ड, जमीन आणि हक्क हिसकावून घेऊन तुमच्यावर राज्य करण्याचा डाव आहे. पण मी असे होऊ देणार नाही, बि इच्छितात, परंतु ते हे होऊ देणार नाहीत. बिहारच्या तरुणांच्या पाठिंब्यानंतर आता “मोदी-शाह आणि निवडणूक आयोग मते चोरण्यापूर्वी दोनदा विचार करतील” असा दावा त्यांनी केला. राहुल यांनी असेही आश्वासन दिले की जर त्यांचे सरकार आले तर प्रथम जातीय जनगणना होईल आणि नंतर आरक्षण मर्यादा रद्द केली जाईल.

मी खुली पत्रकार परिषद घेतली. पण माझ्या पत्रकार परिषदेवर भाजपच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही. मोदी-शाहांनी एक शब्द नाही काढला, जेव्हा चोर पकडला जातो. तेव्हा तो पूर्णपणे शांत होतो. कारण त्याला माहिती असते आपली चोरी पकडली गेली आहे. आपण फसलो आहोत. असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

Ganesh Chaturthi 2025: तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता…! गणपती उत्सवानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या यात्रेत काल प्रियंका गांधींसह दक्षिणेकडील दिग्गज नेतेही काल सामील झाल्याचे पाहायला मिळाले. तेलंगाणाचे मुख्मंत्री रेवंत रेड्डी हेदेखील सामील झाले होते. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि द्रमुक संसदीय पक्षाच्या नेत्या कनिमोझी मतदार हक्क यात्रेच्या ११ व्या दिवशी सामील होणार असल्याची माहिती आहे. पण त्याचवेळी प्रियंका गांधी आणि रेवंत रेड्डींच्या या यात्रेत सामील होण्यामुळे भाजप मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले होते की मतदार हक्क यात्रा ही मत चोरीविरुद्धची ऐतिहासिक चळवळ ठरत आहे. ही मोहीम केवळ बिहारपुरती मर्यादित नसून संपूर्ण देशातील लोकांना आकर्षित करत असल्याचा त्यांचा दावा आहे. या यात्रेत काँग्रेससह इंडिया ब्लॉकमधील प्रमुख नेते सहभागी होत आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे नुकतेच बिहारमध्ये पोहोचले आणि या यात्रेत सामील झाले. राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्यासोबत इतर विरोधी नेत्यांची यात्रेत सहभागी होण्याची मालिका सुरू आहे.

Web Title: Bihar news conspiracies are being hatched across the country to steal votes priyanka gandhi makes serious allegations against prime minister modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील; बाळासाहेब थोरातांचा विश्वास
1

पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील; बाळासाहेब थोरातांचा विश्वास

Rahul Gandhi: राहुल गांधींची सुरक्षा भेदली! भर यात्रेत एका तरुणाने घेतला ‘Kiss’, नंतर झाला पसार; पाहा व्हिडिओ
2

Rahul Gandhi: राहुल गांधींची सुरक्षा भेदली! भर यात्रेत एका तरुणाने घेतला ‘Kiss’, नंतर झाला पसार; पाहा व्हिडिओ

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
3

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
4

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.