Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: “अमरनाथ यात्रा रद्द केली…”; मंत्री पियुष गोयल यांचे महत्वाचे विधान

मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यानी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्य्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 26, 2025 | 02:39 PM
Pahalgam Terror Attack: “अमरनाथ यात्रा रद्द केली…”; मंत्री पियुष गोयल यांचे महत्वाचे विधान
Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यानी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्य्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. तसेच भारताने नौदल, लष्कर, वायुसेनेने ‘आक्रमण’ युद्धाभ्यास देखील सुरु केला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रा होणार कि नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, भारत दहशतवाद्यांना घाबरणार नाही. दहशतवाद्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच अमरनाथ यात्रा स्थगिती केली जाणार नाही. अमरनाथ यात्रा रद्द केली जाणार नाही. अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. यासाठी अनेक भाविकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पियुष गोयल यांनी अमरनाथ यात्रेबाबत भाविकांना आश्वासन दिले आहे. काश्मीरमध्ये पुन्हा लवकरच पर्यटन सुरु होईल. काश्मीरचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही.

अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. हि यात्रा अनंतनाग मधून सुरु होणार आहे. पहलगाम ट्रेक आणि गंदेरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गापासून सुरु होणार आहे. भाविकांच्या भोवती सुरक्षेचें मोठे कडे असणार आहे. यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी भारतीय लष्कराने अत्यंत चोख सुरक्षा व्यव्था ठेवली जाणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे.

भारताच्या ‘आक्रमणा’ने घाबरला पाकिस्तान

पाकिस्तानचे लष्कररमुख जनरल असीम मुनीर यांनी खासगी एअरक्राफ्टच्या मदतीने आपल्या परिवाराला विदेशात पाठवले आहे. याशिवाय अनेक उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या परिवाराला युरोपियन देशात पाठवले असल्याचे समजते आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारत हल्ला करेल अशी भीती वाटत आहे. त्यामुळेच सैन्य अधिकाऱ्यांनी आपल्याला परिवाराला विदेशात पाठवले असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भीती

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती त्यांना सतावत आहे. भारताने लष्कर, वायुसेना आणि नौदलाचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. भारताने राफेल आणि सुखोई या लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. त्यामुळे भारत काही दिवसांत हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे.

Pahalgam Terror Attack: भारताच्या ‘आक्रमणा’ने घाबरला पाकिस्तान; आर्मी चीफने खासगी एअरक्राफ्टच्या मदतीने थेट…

आता पाकिस्तानची खैर नाही

पाकिस्तान पुसकरुत दहशतवाद्यांवर भारताने लष्करी कारवाई सुरू केली पाहिजे असे माजी हवाई दल प्रमुख आरूप रहा म्हणाले आहेत. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दोन आण्विक शक्ती असलेले देश युद्ध करू शकत नाहीत ही व्याख्या भारताने मोडून काढली आहे. भारताने उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना थोकण्याचे काम अधिक प्रभावीपणे केले आहे.

 

Web Title: Central minister piyush goyal said amarnath yatra not cancelled after pahalgam terror attack in jammu kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • Amarnath Yatra
  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता
1

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता
2

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी
3

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी

सहा वर्षांपासून देशाचा मुकूट फक्त केंद्र शासित प्रदेश; जम्मू काश्मीरला कधी मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा
4

सहा वर्षांपासून देशाचा मुकूट फक्त केंद्र शासित प्रदेश; जम्मू काश्मीरला कधी मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.