Congress' Karpuri Rath Yatra after Voter Rights Yatra, will it save Congress?
Karpoori Rath Yatra in Bihar: बिहारचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणातील एक दुवा राहिले आहेत. जे ईबीसी (Other Backward Class) व्होट बँकेला कोणत्याही पक्षाशी जोडू शकतात. आता त्याच कर्पूरी ठाकूर यांच्या नावाने काँग्रेस बिहारच्या राजकारणात आपला गमावलेला आदर परत मिळवू इच्छित आहे. बिहारमध्ये राहुल गांधींच्या मतदान अधिकार यात्रेच्या यशानंतर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली कर्पूरी रथयात्रेची अटकळ होती. तथापि, आता माजी खासदार आणि काँग्रेस नेते उदित राज यांनी याची पुष्टी केली आहे.
माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणातील एक दुवा आहेत, जे ईबीसी (Other Backard Class) व्होट बँकेला कोणत्याही पक्षाशी जोडू शकतात. आता त्याच कर्पूरी ठाकूरच्या यांच्या नावाने काँग्रेस पक्ष बिहारच्या राजकारणात आपला गमावलेला आदर परत मिळवू इच्छित आहे. बिहारमध्ये राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेच्या यशानंतर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली कर्पूरी रथयात्रा काढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता माजी खासदार आणि काँग्रेस नेते उदित राज यांनी याची पुष्टी केली आहे.
Tax घोटाळे ओळखा, तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करा; कुठे कराल तक्रार इत्यंभूत माहिती
ही यात्रा काँग्रेसला राजकीय आदर परत मिळवून देऊ शकते असा काँग्रेसला विश्वास आहे. बिहार काँग्रेस नेतृत्वाने हा मुद्दा राहुल गांधींसमोर उपस्थित केला होता. यावर राहुल गांधींनी, आदर मागून मिळत नसतो, तो मिळवला जातो. यासाठी तुम्ही लोकांनी राज्यात काम केले पाहिजे, यासाठी आमचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत, असे उत्तर दिले होते.
त्यानंतर आता काँग्रेस बिहारच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे दिसू लागले आहे. बिहारच्या सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये कर्पूरी रथयात्रा काढली जाईल. राहुल गांधी यांची बहीण आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी या यात्रेचे नेतृत्व करू शकतात, असे सांगितले जात आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे यात्रेची सुरुवात करतील. कर्पूरी रथयात्रेदरम्यान राहुल, खर्गे आणि प्रियांका हे त्रिकूट प्रमुख जिल्ह्यांमध्ये दिसतील अशी चर्चा आहे.
माजी खासदार डॉ. उदित राज यांनी सोशल मीडियावर कर्पूरी रथयात्रेचे वर्णन बिहारच्या राजकारणातील एका नव्या प्रयोगाप्रमाणे केले आहे. त्यांच्या मते, ही यात्रा ४० दिवसांची असून ती बिहारच्या सर्व ३८ जिल्ह्यांतून जाणार आहे. काँग्रेसने उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलाबद्दल त्यांनी बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम, राज्य प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि यात्रेचे समन्वयक कुणाल बिहारी यांचे अभिनंदन केले आहे.