Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर! ५ ऑगस्ट अन् ठिकाण बेंगळुरू; राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ॲटमबॉम्ब

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. येत्या ५ ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये सर्व पुरावे सादर करणार आहे, त्यानंतर आयोगाला तोंड लपवायलाही जागा राहणार नाही, असा गंभीर इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Aug 01, 2025 | 10:08 PM
ठरलं तर! ५ ऑगस्ट अन् ठिकाण बेंगळुरू; राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ॲटमबॉम्ब

ठरलं तर! ५ ऑगस्ट अन् ठिकाण बेंगळुरू; राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ॲटमबॉम्ब

Follow Us
Close
Follow Us:

वडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करत आहे. हा फक्त आरोप नाही तर यासंदर्भात १०० टक्के पुरावे असून आयोगावर अॅटमबॉम्ब पडणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाला तोंड लपवायलाही जागा उरणार नाही, असा गंभीर इशारा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांचं खंडण केलं असून दररोज असे निराधार आरोप केले जात आहेत. त्याकडे लक्ष देत नसल्याचं म्हटलं आहे.

मतदार यादीतून नाव वगळल्याचा फायदा नक्की कोणाला? NDA की महाआघाडी, वाचा सविस्तर

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी निवडणूक आयोगाने मतदार यादी विशेष फेरपडताळणी मोहीम सुरू केली. परिणाम ६५ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यावरून विरोधी पक्षांनी आयोग आणि सरकारवर टीकेची झोड उठवली. आता पाच राज्यामध्ये मतदार यादीची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी यावरूनच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान भाजपनेही राहुल गांधींचीही भाषा लोकशाहीविरोधी आणि अशोभनीय अशल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मी आधीही म्हटलं आहे की मतांची चोरी केली जात आहे. निवडणूक आयोग यात सहभागी असल्याचा आमच्याकडे आता ठोस पुरावा देखील आहे. मनाला वाटलं म्हणून मी आरोप करत नाही. माझ्याकडे 100 टक्के पुरावा आहे. ते पुरावे सार्वजनिक केल्यानंतर संपूर्ण देशासमोर निडणूक आयोगाची पोलखोल होणार आहे. हे सर्व भाजपसाठी केले जात आहे, हे ही समोर येणार आहे. महाराष्ट्रात राज्यभर मतदानात गैरप्रकार घडला आहे, याची खात्री आहे. मतदार यादीचे पुनरावलोकन झाले आणि एक कोटी नवीन मतदार जोडले गेले. त्यानंतर आम्ही अधिक तपशीलात गेलो. आयोगाने सहकार्य न केल्यामुळे स्वतः चौकशी केली. सहा महिने तपास केल्यानंतर जो पुरावा मिळाला, तो ‘अणुबॉम्ब’ आहे. तो फुटल्यावर आयोगाला लपण्यासाठी कुठेच जागा शिल्लक राहणार नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे.

यामध्ये जे निवडणूक आयोगाचे अधिकारी सहभागी आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार जाणार नाही. हा देशद्रोह आहे. तुम्ही निवृत्त झालात, कुठेही असाल तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राहुल गांधी व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकनावर विशेष चर्चा घेण्याची मागणी केली आहे. मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी SIR मोहीम आखण्यात आली. आयोगाचा हाच उद्देश आहे, असं यातून स्पष्ट होतं.

दरम्यान गुरुवारी ५ ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत जाणीवपूर्वक घोटाळा केल्याचा पुरावा सादर केला जाणार आहे. अशा निवडणूक गैरप्रकारांना चालू देणार नाही, असं कॉंग्रेसने म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाकडून आरोपांचं खंडण

निवडणूक आयोगावर दररोज निराधार आरोप केले जात आहेत. अशा आरोपांकडे लक्ष देत नाही. अशा धमक्यांना न घाबरता, सर्व निवडणूक अधिकारी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करत आहेत. तसंच आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी १२ जून रोजी राहुल गांधींना ईमेलद्वारे आमंत्रण दिले होतं. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. तसंच राहुल गांधी यांनी आयोगाकडे औपचारिकरित्या कधीच कोणतीही तक्रार केली नव्हती, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

भाजपची टीका

राहुल गांधी यांचा तो अॅटमबॉम्ब फुसका निघणार आहे. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची निवडणूक आयोगाविषयी अशी भाषा लोकशाहीविरोधी आणि अशोभनीय असल्याची टीका भाजपने केली आहे.

संबित पात्रा म्हणाले, “राहुल गांधी बॉम्ब फोडणार का? तुम्हाला काय वाटतं? त्यांचं कामच आहे फुटणे. त्यांनी दुसरे काही काम उरलेले नाही. विचार करा ही कोणत्या प्रकारची भाषा आहे. तुम्ही म्हणता, मी सर्वोच्च न्यायालयात जाईन, लोकशाही मार्गाने आंदोलन करीन’, पण बॉम्ब फोडणारी भाषा, लोकशाहीला शोभणारी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Congress leader rahul gandhi serious allegations on election commission of vote theft evidence give 5 august in bengaluru

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 10:08 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Bogus Voting
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
2

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा
3

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.