Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा

Operation Sindoor: आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2025 | 04:23 PM
“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली/Rajnath Singh/Parliament Live: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सनदेत भारत सरकारने आणि लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत सभागृहाला माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य दलांचे कौतुक केले. तर विरोधकांना देखील चांगलेच सुनावले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेले नाही असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे. जर कोणी आमच्या नागरिकांना मारणार असेल तर, आमच्या मिसाईल्स सीमा पार करणारच. आमचे सैनिक शत्रू राष्ट्रात घुसून कारवाई करणारच. आम्ही दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी पूर्णपणे तत्पर आहोत.”

पुढे बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ” आम्ही पाकिस्तानच्या दबावाखाली युद्धबंदी केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. संपूर्ण ऑपरेशन आम्ही २२ मिनिटात पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताचे यश आहे. तीनही सैन्य दलांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.”

“आम्ही केलेली कारवाई ही पूर्णपणे आमच्या संरक्षणासाठी केलेली होती. ती चिथावणीखोर कारवाई नव्हती. पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक युद्धाचा वापर केला. त्यांच्या निशाण्यावर आपली अनेक विमानतळे आणि महत्वाची साधने होती. मात्र आपल्या सैन्य दलांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे उधळून लावला आहे.

“आम्ही दशतवादाला मुळापासून संपवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. १०० पेक्षा जास्त दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. भारत कोणत्याही अवस्त्र युद्धाच्या भीतीला भीक घालणार नाही. दहशतवादाचा बिमोड केला जाणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांना कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे घृणास्पद आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

“१० मे रोजी पाकिस्तानवर भारतीय हवाई दलाने हल्ला केला. १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले थांबवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदूर केवळ थांबवले आहे, ते पूर्णपणे बंद केलेले नाही. पाकिस्तानने पुन्हा भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर, ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु केला जाईल, असे स्पष्टपणे राजनाथ सिंह यांनी संसदेतील चर्चेत स्पष्ट केले आहे.

Web Title: Deffence minister rajnath singh warn to pakistan about terrorism operation sindoor discussion in parliament in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • pakistan
  • Rajnath Singh
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच
1

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…
2

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…

PoK protests : इस्लामाबाद हादरले! पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने नियंत्रणाबाहेर; 38 कलमी मागण्यांसह हजारो लोक उतरले रस्त्यावर
3

PoK protests : इस्लामाबाद हादरले! पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने नियंत्रणाबाहेर; 38 कलमी मागण्यांसह हजारो लोक उतरले रस्त्यावर

PoK Shutdown : फोन बंद, रस्ते ओसाड आणि 3,000 सैनिक तैनात; पाकिस्तानच्या पीओकेमध्ये काही अघटित घडण्याचे संकेत
4

PoK Shutdown : फोन बंद, रस्ते ओसाड आणि 3,000 सैनिक तैनात; पाकिस्तानच्या पीओकेमध्ये काही अघटित घडण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.