Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Elections : ‘केजरीवाल आणि आतिशी दोघांचाही पराभव होणार?’ या बड्या नेत्याचा दावा

भाजपचे नेते अमित शहा यांनी अरवींद केजरीवाल आणि आतिशी, दोघांचाही त्यांच्या मतदार संघातून पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. तसंच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबतही भाष्य केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 28, 2025 | 08:44 PM
'केजरीवाल आणि आतिशी दोघांचाही पराभव होणार?' या बड्या नेत्याचा दावा

'केजरीवाल आणि आतिशी दोघांचाही पराभव होणार?' या बड्या नेत्याचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते अमित शहा यांनी अरवींद केजरीवाल आणि आतिशी, दोघांचाही त्यांच्या मतदार संघातून पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. तसंच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबतही भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते.

अमित शहा यांची मंगळवारी बदरपूर विधानसभा मतदारसंघात सभा झाली. अमित शहा यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला.

अमित शहा म्हणाले की, गरिबांसाठी असलेली एकही कल्याणकाही योजना बंद करणार नाही, असा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. देशातील गरिबांच्या कल्याणासाठी पहिली योजना २०१४ नंतर नरेंद्र मोदींनी सुरू केली. मग ती उपचार योजना असो, मोफत घर असो, शौचालय असो, रेशन असो किंवा गॅस सिलेंडर असो. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केजरीवाल यांनी मोफत योजना बनवली. भाजपने पायाभूत सुविधांची उभारणी केली आणि गरीब कल्याणकारी योजनाही राबवल्या. मग ते मध्यप्रदेश असो, छत्तीसगड असो किंवा इतर कोणतंही राज्य असो.

जर दिल्लीत भाजपचा विजय झाला तर मुख्यमंत्री कोण असेल? प्रवेश वर्मा मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नाच्या उत्तरात अमित शहा म्हणाले की, केजरीवाल स्वतः नवी दिल्लीतून हरणार आहेत. आतिशी यांचा देखील पराभव होणार आहे. आमचा सध्याचा प्रयत्न दिल्लीवर विजय मिळवण्याचा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल. दिल्लीच्या ७० लोकांना वाटतं की ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनू शकतात. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या खुर्जीवर कोणाचीही वर्णी लागू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील भाजपचा राजकीय वनवास संपणार आहे का? यावर शाह म्हणाले की, खोट्याचे आयुष्य जास्त काळ नसतं. केजरीवाल सरकारला १० वर्षे झाली आहेत. आता खोटेपणा उघड झाला आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दिल्लीत विस्कळीतपणा चालवला, त्यातून सर्वत्र अराजकता आहे.

भाजपचे हरियाणा सरकार यमुनेत विष मिसळत असल्याचा आरोप आपने केला आहे. यावर अमित शहा म्हणाले की, आज मी त्यांना विचारले आहे की त्यांनी कोणते विष मिसळले आहे, कृपया त्याचे नाव सांगा. विष मिसळले आहे, त्याचा चाचणी अहवाल कुठे आहे? जर पाणी थांबवले तर किमान १० गावे पाण्याखाली जातील. पण एकही गाव पाण्याखाली गेले नाही. ते खोटं बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जनतेला घाबरवून आणि दहशत पसरवून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आणि हरियाणा सरकार त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करणार आहे.

Web Title: Delhi election amit shah attack on arvind kejriwal and atishi bjp cm face marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 08:42 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Arvind kejriwal
  • Delhi Election 2025
  • Delhi Elections

संबंधित बातम्या

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
1

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
2

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
3

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन
4

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.