Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi News: जज नियुक्तीत केंद्राचा दबाव; विरोधात निकाल दिल्यास बदली करणे चुकीचे: न्या. भुईयां

न्यायमूर्ती भुईयां यांनी आठवण करून दिली की, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोटाने कॉलेजियम प्रणालीत विकसित केली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 25, 2026 | 01:35 PM
Collegium System, HighCourt, Supreme Court, Chhatisgrah

Collegium System, HighCourt, Supreme Court, Chhatisgrah

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यायमूर्तीच्या बदल्यांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आता खुद्द न्यायमूर्तीच अस्वस्थ
  • न्यायमूर्तीच्या बदली आणि नियुक्तीमध्ये केंद्र सरकारला कोणताही अधिकार असू शकत नाही
  • सरकारच्या विरोधात असोयीस्कर’ निकाल दिला म्हणून त्यांची बदली व्हायला हवी का?
Delhi News: हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या बदल्यांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आता खुद्द न्यायमूर्तीच अस्वस्थ होऊ लागले आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुईयां यांनी माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या. कार्यकाळातील कॉलेजियमच्या एका निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉलेजियम प्रणालीमध्ये, कार्यपालिकेच्या (सरकारच्या) हस्तक्षेपावर त्यांनी उघडपणे टीका केली. हे संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या बदलीशी संबंधित आहे. न्यायमूर्ती श्रीधरन यांची मध्य प्रदेशमधून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी ही बदली केंद्र सरकारच्या विनंतीवरून करण्यात आल्याचे म्हटल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. न्यायमूर्ती भुईयां यांनी याला कॉलेजियमच्च्या निर्णयांवर सरकारच्या प्रभावाची स्पष्ट कबुली असल्याचे म्हटले आहे.

बांग्लादेशला बाहेर केल्यानंतर ICC ने स्कॉटलंडचे सामने केले निश्चित! T20 World Cup 2026 चे नवे वेळापत्रक जाहीर

कॉलेजियमच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह

न्यायमूर्ती भुईयां यांनी ऑक्टोबर २०२३ मधील घटनेचा संदर्भ दिला. त्यावेळी कॉलेजियमने मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्रीधरन यांना आपल्या मूळ प्रस्तावात बदल करत छत्तीसगडाऐवजी अलाहाबाद हायकोर्टात पाठवण्याची शिफारस केली होती. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, न्यायमूर्तीच्या बदली आणि नियुक्तीमध्ये केंद्र सरकारला कोणताही अधिकार असू शकत नाही, हा पूर्णपणे न्यायपालिकेचा विशेषाधिकार आहे. कॉलेजियमच्या प्रस्तावात ‘केंद्र सरकारच्या विनंतीवरून बदल केला’ असे नमूद करणे, हे कार्यपालिकेच्या प्रभावाची कबुली आणि कॉलेजियम प्रणालीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

मंत्र्यांच्या अभद्र टिप्पणीची घेतली दखल

न्यायमूती श्रीधरन यांना छत्तीसगडला पाठवले असते तर ते तिथे कॉलेजियमचे सदस्य बनले असते, मात्र अलाहाबादमध्ये त्यांची ज्येष्ठता खाली गेली, न्यायमूर्ती श्रीधरन यांना एक ‘निडर न्यायाधीश’ मानले जाते. एका खासदार-मंत्र्याने कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या अभद्र टिप्पणीची त्यांनी स्वत हुन दखल घेतली होती. त्यामुळेच त्यांच्या बदलीकडे संशयाने पाहिले जात आहे. न्यायमूर्ती भुईया यांनी विचारले की, एखाद्या न्यायाधीशाने सरकारच्या विरोधात असोयीस्कर’ निकाल दिला म्हणून त्यांची बदली व्हायला हवी का? यामुळे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर गदा येत नाही का? त्थानी जोर देऊन सांगितले की, न्यायाधीशाची बदली केवळ ‘न्यायदानाच्या सोयीसाठी’ व्हायला हवी, शिक्षा देण्यासाठी नाही.

China Crisis: शी जिनपिंग यांचा जीव धोक्यात? भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्याच सैन्याचा नरसंहार

कॉलेजियमवर प्रभाव पडता कामा नये

न्यायमूर्ती भुईयां यांनी आठवण करून दिली की, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोटाने कॉलेजियम प्रणालीत विकसित केली होती. कॉलेजियमचे सदस्य स्वतःच कार्यपालिकेच्या प्रभावाखाली येऊ लागले, तर ते या प्रणालीच्या मूळ उद्देशापासून भरकटल्यासारखे होईल. ते पुढे म्हणाले की, जेव्हा न्यायपालिकेने कॉलेजियम प्रणाली बदलण्याचा सरकारचा प्रयत्न फेटाळून लावला आहे, तेव्हा कॉलेजियमने पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करणे अधिक गरजेचे ठरते. कॉलेजियम प्रक्रियेची विश्वासार्हता कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवावी लागेल, त्यांनी असा इशाराही दिला की, आज न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका ‘आतल्या गोटातूनच निर्माण होऊ शकतो.

 

 

Web Title: Delhi news central government pressure in judge appointments transferring judges for giving unfavorable verdicts is wrong justice bhuyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 01:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.