Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Nepal FYI: नेपाळमध्ये जाण्यासाठी का लागत नाही पासपोर्ट किंवा व्हिसा? 1950 चा करार काय सांगतो?

Nepal Crisis: नेपाळ आणि भारतामध्ये 1,751 किलोमीटर लांबीची सीमा आहे. बिहार, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भारतातील राज्यांची सीमा नेपाळला लागून आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2025 | 04:06 PM
India-Nepal FYI: नेपाळमध्ये जाण्यासाठी का लागत नाही पासपोर्ट किंवा व्हिसा? 1950 चा करार काय सांगतो?
Follow Us
Close
Follow Us:

भारत-नेपाळ सीमेवर प्रवासाला लागत नाही व्हिसा-पासपोर्ट
भारत-नेपाळ यांच्यात आहे जुनी मैत्री 
1950 चा करार होता तरी काय?

Do You Know: भारत आणि नेपाळ हे शेजारी राष्ट्र आहेत. दरम्यान सध्या नेपाळमध्ये अस्थिर वातावरण पाहायला मिळत आहे. नेपाळमध्ये सत्तापालट झाले आहे. हिंसाचार सुरू आहे. दरम्यान भारत आणि नेपाळ सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत आणि नेपाळ देशांमध्ये एकूण 1,751 किलोमीटर लांब इतकी सीमा आहे. दरम्यान नेपाळ-भारत सीमेवर पासपोर्ट किंवा व्हिसा लागत नाही. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? चल तर मग आजच्या या लेखातून व्हिसा आणि पासपोर्ट का लागत नाही हे, जाणून घेऊयात.

नेपाळ आणि भारतामध्ये 1,751 किलोमीटर लांबीची सीमा आहे. बिहार, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भारतातील राज्यांची सीमा नेपाळला लागून आहे. डोही देशांमध्ये व्यापाराचे संबंध देखील आहेत. मात्र दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा दाखवावा लागत नाही. याला 1950 मध्ये भारत आणि नेपाळमध्ये झालेला करार महत्वाचा आहे.

भारत आणि नेपाळमध्ये चांगले सबंध निर्माण व्हावेत म्हणून 1950 मध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता आणि मैत्री करार करण्यात आला होता. 75 वर्षांपूर्वी झालेला हा करार आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची गरज लागत नाही.

काय आहे 1950 चा करार?

भारत आणि नेपाळ या देशांमध्ये 31 जुलै 1950 मध्ये शांततेचा आणि मैत्रीचा द्विपक्षीय करार झाला होता. हा करार म्हणजे दोन्ही देशांमधील एक महत्वाचा भाग आहे. हा करार दोन्ही देशांना शांती, मैत्री आणि सर्वभौमत्व प्रदान करते. तसेच एकमेकांच्या जमिनीवर हस्तक्षेप न करण्याबाबत देखील सांगतो.

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय

भारत आणि नेपाळमध्ये अनेक वर्षांपासून आर्थिक, धार्मिक, सामाजिक संबंध राहिले आहेत. नेपाळ बऱ्याच अंशी भारतावर अवलंबून आहे. हजारो नेपाळी नागरिक भारतात काम करतात. तर भारतीय देखील नेपाळमध्ये काम करतात. दरम्यान 1950 च्या करारानुसार, नेपाळ भारत सोडून जेव्हा दुसऱ्या देशाकडून शस्त्रे खरेदी करेल, तेव्हा त्याला भारताशी चर्चा करावी लागेल.

1950 च्या दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, नागरिकांना दोन्ही देशांत मालमत्ता बाळगणे, व्यापार करणे,  राहण्याचा आणि स्थलांतरित होण्याचा अधिकार आहे. म्हणजेच नेपाळचा नागरिक भारतात व भारताचा नागरिक नेपाळमध्ये मालमत्ता खरेदी करू शकतो. भारताचा नागरिक नेपाळमध्ये कुठेही राहू शकतो. तसेच नेपाळी नागरिकाला कराराच्या अंतर्गत भारतात राहण्याचा अधिकार आहे. भारतीय नागरिक व्हिसाशिवाय नेपाळमध्ये प्रवास करू शकतात, असे 1950 च्या करारात नमूद करण्यात आले आहे. तसेच दोन्ही देश हा करारात बदल करण्याबाबत चर्चा करून शकतो.

Web Title: Do you know about india nepal 1950 peace and friendship agreement not need to visa and passport both side peoples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • india
  • India Nepal Border
  • nepal
  • passport news

संबंधित बातम्या

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र  क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान
1

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?
2

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले
3

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले

Corruption: जगातील भ्रष्टाचार देशांची यादी जाहीर, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये टॉपमध्ये; भारत कितव्या स्थानी?
4

Corruption: जगातील भ्रष्टाचार देशांची यादी जाहीर, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये टॉपमध्ये; भारत कितव्या स्थानी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.