Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्लामाबाद ते कराची हादरले! भारताच्या INS विक्रांतची धमाकेदार एन्ट्री, पाकची हवा टाइट

या भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान आता भारताच्या आयएनएस विक्रांतची (INS Vikrant) एन्ट्री झाली आहे. भारताने समुद्रामार्गे पाकिस्तानवर आणखी एक मोठा घाव घातला. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2025 | 07:50 AM
INS VIKRANT (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

INS VIKRANT (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चोक प्रत्युत्तर दिले. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरु करण्यात आले होते. भारताने पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. ड्रोन आणि हवाई हल्ल्यांद्वारे इस्लामाबादपर्यंत थेट धडक दिली गेली. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांनी संपूर्ण राजधानी हादरून गेली. फक्त इस्लामाबादच नव्हे, तर लाहोर, पेशावर आणि आणखी 16 शहरांमध्ये हल्ल्यांची मालिका सुरू झाली. पाकिस्तान सरकारला काही शहरांत ब्लॅकआऊट करावा लागला त्यामुळे जनतेत घबराटीचं वातावरण आहे.

India Vs Pakistan War Live: पाकिस्तानवर दुहेरी संकट; इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले

या भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान आता भारताच्या आयएनएस विक्रांतची (INS Vikrant) एन्ट्री झाली आहे. भारताने समुद्रामार्गे पाकिस्तानवर आणखी एक मोठा घाव घातला. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. INS Vikrant (IAC-1) या भारतातच बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेने कराची बंदरावर तुफानी हल्ले चढवले. कराची बंदरावर 14 पेक्षा अधिक स्फोट झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं सांगितलं जात आहे. नौदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानने बंदर परिसरातही ब्लॅकआउट जाहीर केला. 1971 नंतर प्रथमच भारताने कराचीवर असा थेट हल्ला चढवला.

INS Vikrant– गेम चेंजर

आयएनएस विक्रांतच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले एमआयजी-29के लढाऊ विमान 850 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. त्यात 64 बराक आणि 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत, जी हवेत आणि जमिनीवर अचूकपणे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. ही जेट्स आणि क्षेपणास्त्रे काही मिनिटांत पाकिस्तानचे नौदल तळ, विमानतळ किंवा इतर महत्त्वाची ठिकाणे नष्ट करू शकतात. जर आयएनएस विक्रांत पाकिस्तानसमोर उभी राहिली तर ती सहजपणे हल्ला करू शकते. उपग्रह प्रतिमांनुसार, पाकिस्तानकडे फक्त दोन जुन्या पाणबुड्या आहेत, ज्या आयएनएस विक्रांतशी स्पर्धा करू शकत नाहीत, उर्वरित दुरुस्त्या सुरू आहेत. जर युद्ध झाले तर आयएनएस विक्रांत गेम चेंजर ठरेल.

आयएनएस विक्रांत (IAC-1) ची महत्वपूर्ण माहिती

  • प्रकार: विमानवाहू युद्धनौका (Aircraft Carrier)
  • निर्मिती: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Ltd., केरळ)
  • देशी बनावट: ही भारतात पूर्णतः तयार झालेली पहिली विमानवाहू जहाज आहे.
  • लांबी: सुमारे 262 मीटर
  • वजन: 45,000 टन
  • गती: 28 नॉट्स (सुमारे 52 किमी/तास)
  • एअर विंग: मिग-29के फायटर जेट्स, कामोव्ह हेलिकॉप्टर्स, तसेच हलके हेलिकॉप्टर्स
  • प्रवेश (Commissioned): 2 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलात समाविष्ट झाला.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

1961 मध्ये भारताने ब्रिटीश-निर्मित ‘INS Vikrant’ खरेदी केली होती, जी 1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्ध वापरली गेली. आता त्याच नावाने सजलेली ‘नवीन विक्रांत’ भारतीय नौसेनेला अधिक आधुनिक ताकद देते. ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारत हे विमानवाहू युद्धनौका बनवणाऱ्या निवडक देशांपैकी एक बनले आहे. यामुळे भारतीय नौदलाची हिंद महासागर व प्रदेशातील ताकद वाढली आहे.

पाकिस्तानकडून हल्ले अन् भारताकडून चोख प्रत्युत्तर; आत्तापर्यंत ‘या’ महत्त्वपूर्ण घडल्या घडामोडी…

Web Title: From islamabad to karachi there was a stir indias ins vikrants explosive entry pakistans air is tight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 07:50 AM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत! चाहत्यांनी तिलक आणि सूर्याच्या नावाच्या दिल्या घोषणा
1

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत! चाहत्यांनी तिलक आणि सूर्याच्या नावाच्या दिल्या घोषणा

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?
2

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?

Varun Chakravarthy कोणाला ऐकत नाही! ट्राॅफी नाही तर काय झालं, कपला मिठी मारुन झोपला मिस्ट्री स्पिनर… काही तासात Post Viral
3

Varun Chakravarthy कोणाला ऐकत नाही! ट्राॅफी नाही तर काय झालं, कपला मिठी मारुन झोपला मिस्ट्री स्पिनर… काही तासात Post Viral

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल
4

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.