Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Elections 2025: ४०% हिंदू आणि २०% मुस्लिम एकत्र आल्यास…; बिहार निवडणुकीसाठी प्रशांत किशोरांचा नवा फॉर्म्युला

एकेकाळी नितीश कुमार यांचे विश्वासू अशी प्रशांत किशोर यांची ओळख होती. त्यांची मोहीम तळागाळातील लोकांचे एकत्रीकरण आणि हिंदी हृदयभूमीत भाजपच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी हिंदू-मुस्लिम युतीवर केंद्रित आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2025 | 01:18 PM
Bihar Elections 2025: ४०% हिंदू आणि २०% मुस्लिम एकत्र आल्यास…; बिहार निवडणुकीसाठी प्रशांत किशोरांचा नवा फॉर्म्युला
Follow Us
Close
Follow Us:
  • विशेष सघन पुर्नपडताळणी म्हणजेच SIR वरून  राहुल गांधीचे केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
  • हिंदु-मुस्लिम दोन्ही समाजाला आवाहन
  • भाजपच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी हिंदू-मुस्लिम युतीचा संदेश

Bihar Elections 2025: येत्या काही दिवसांतच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यंदाची निवडणूक बिहारसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या विशेष सघन पुर्नपडताळणी म्हणजेच SIR वरून खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. एसआयआरच्या माध्यमातून मते चोरली जात आहेत, मतदार यादीतून ६५ लाख मतदारांची नावे वगळली जात आहेत. असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव मत अधिकार यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करताना दिसत आहेत.

Beed crime: बीड हादरलं! अंबाजोगाई येथील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, बीडमध्ये चाललंय तरी काय?

हे सुरू असतानाच दुसरीकडे बिहार निवडणुकीपूर्वी, जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मुस्लिमांबद्दल एक मोठे विधान केले आहे. मुस्लिम समुदायापर्यंत आपला विस्तार वाढवत प्रशांत किशोर यांनी घोषणा केली आहे. जनसुराज पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोघांनाही या दोन समुदायाच्या पाठिंब्याने पराभूत करू शकतो, असा दावा केला आहे.

मंगळवारी (२६ ऑगस्ट) मोतिहारी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना किशोर म्हणाले की, आज मी माझ्या मुस्लिम बांधवांना आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. जर आम्हाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळाला तर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपलाच हरवू असे नाही तर दोन वर्षांनी उत्तर प्रदेशात योगींनाही पराभूत करू.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१५ मध्ये नितीश कुमार यांना पुनरागमन करण्यास मदत केली होती. पण यावेळी प्रशांत किशोर यंनी पक्षाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे साधन सादर करत किशोर म्हणाले की, जर ४० टक्के हिंदू आणि २० टक्के मुस्लिम एकत्र आले तर जन सूराजचा विजय निश्चित आहे.

Earthquake News : हिमालयाच्या कुशीत भीषण हालचाली, तिबेट पुन्हा थरथरला; 10 किमी खोलीवर केंद्रबिंदू

बिहारच्या गर्दीच्या राजकीय क्षेत्रात जनसुराज पक्षाला तिसरी शक्ती म्हणून उभे करण्यासाठी त्यांनी हिंदु-मुस्लिम दोन्ही समाजाला आवाहन केल आहे.जिथे भाजप आणि नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) यांचा समावेश असलेला सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या विरोधी महागठबंधनाच्या विरोधात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या सभेत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मुख्यमंत्री आता राज्य करण्यासाठी योग्य नाहीत. ते आता म्हातारे झाले आहेत, त्यामुळे लोकांना आता नितीशच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. असल्याचा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला होता. दरम्यान, एकेकाळी नितीश कुमार यांचे विश्वासू अशी प्रशांत किशोर यांची ओळख होती. त्यांची मोहीम तळागाळातील लोकांचे एकत्रीकरण आणि हिंदी हृदयभूमीत भाजपच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी हिंदू-मुस्लिम युतीवर केंद्रित आहे. किशोर यांचा संदेश किती प्रभावी असेल हे येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत तपासले जाईल, जिथे जनसुराजचा राज्याच्या जटिल राजकीय रचनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

एकेकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विश्वासू मानले जाणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या जन सुराज मंच आणि राज्यव्यापी ‘बिहार बदलाव यात्रा’द्वारे स्वतःला पर्यायी राजकीय शक्ती म्हणून उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. किशोर यांची मोहीम तळागाळातील लोकांना एकत्र करण्यावर केंद्रित असून, हिंदी हृदयभूमीत भाजपच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी हिंदू-मुस्लिम युतीचा संदेश देण्यात येत आहे. त्यांचा हा संदेश किती प्रभावी ठरेल, हे येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. जन सूरज राज्याच्या गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Web Title: If 40 hindus and 20 muslims come together prashant kishors new formula for bihar elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 01:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.