Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या घशाला पडणार कोरड; चिनाब नदीवरील बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा भारताचा निर्णय

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढतो आहे. सिंधू नदी करार रद्द करण्यात आल्यानंतर आता चिनाब नदीवरील बागलीहार प्रकल्पातून पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 04, 2025 | 05:16 PM
India decision to block Pakistan water from Baglihar project on Chenab river

India decision to block Pakistan water from Baglihar project on Chenab river

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू – काश्मीर : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करुन पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. याचबरोबर भारताने पाकिस्तानवर डिजीटल स्ट्राईक केली. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद केले. आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यामुळे अनेक करार रद्द किंवा स्थगित करण्यात येत आहे. जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा भोवऱ्यात अडकला आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता चिनाब नदीचे पाणी बागलीहार धरणाद्वारे रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पाकिस्तानच्या घशाला कोरड पडणार आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारताकडून पाकिस्तानच्या मुस्क्या आवळण्यात येत आहे. अनेक प्रकारची कारवाई करुन पाकिस्तानच्या अडचणींमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताकडून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नदीचे पाणी अडवले जात आहे. यापूर्वी सिंधू जल करार रद्द करण्यात आला. त्यानंतर आचा जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाण्याचे वहन नियंत्रित करण्याची भारताकडे क्षमता आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. यामुळे नदीच्या प्रवाहावर मोठा फरक पडतो.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

CRPF जवानाचे पाकिस्तानी मुलीशी लग्न

केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना सेवा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता, पण याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली नव्हती. शिवाय, हा विवाह कोणत्याही अधिकृत मान्यतेशिवाय करण्यात आला होता. त्यामुळे नियमभंगाच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून हटवण्यात आले आहे.मुनीर अहमद यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वू पाकिस्तानच्या मीनल खान या नागरिकासोबत विवाह केला होता. विवाहानंतर मीनल खान व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि पुढे दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला. मात्र, तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 रोजी संपूनही ती भारतातच थांबली होती. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. याच पार्श्वभूमीवर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत झाली होती. ती अटारी-वाघा सीमेवर असताना, त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात तिच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या आदेशानंतर तिला पुन्हा सीमेवरून परत पाठवण्यात आले.

Web Title: India decision to block pakistan water from baglihar project on chenab river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terrorist Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.