
कतार सरकारने सोमवारी (१२ फेब्रुवारी) आठ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका (Indian Ex Navy Officers Released From Qatar Jail) केली आहे. मध्य-पूर्व देशातील 18 महिने तुरुंगात घालवून त्यापैकी सात आधीच भारतात परतले आहेत. या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर करण्यात आली होती. कतारहून परतल्यावर, एका नौदलाच्या अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींच आभार मानले आहे. ते म्हणाले, “आम्ही भारतात सुखरूप परतलो याचा आम्हाला खूप आनंद आहे. अर्थातच, आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो कारण हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळे शक्य झाले.” भारतात पोहोचल्यावर लोकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.
[read_also content=”‘फर्जी’ रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण, शाहिद कपूरने खास पद्धतीने केलं सेलिब्रेशन; व्हिडिओ केला शेअर! https://www.navarashtra.com/movies/shahid-kapoor-celebrates-one-year-of-farzi-web-series-shared-video-on-instagram-nrps-506166.html”]
कतारहून परतलेल्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय आम्हाला येथे राहणे शक्य नव्हते. आणि हे देखील भारत सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे घडले. भारतात परत येण्यासाठी आम्ही जवळपास 18 महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय आणि कतारशी त्यांचे समीकरण जुळल्याशिवाय हे शक्य झाले नसते. आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत.