Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानमधील भिलवाड्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; भाजी मंडई बंद राहिल्याने शेतकरी आक्रमक

राजस्थानमधील भिलवाडा शहरात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे भाजी मंडई बंद राहिल्याने शेतकरी संतप्त (Farmers Aggressive) झाले आणि त्यांनी भाजीपाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2024 | 08:25 AM
राजस्थानमधील भिलवाड्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; भाजी मंडई बंद राहिल्याने शेतकरी आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

भिलवाडा : राजस्थानमधील भिलवाडा शहरात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे भाजी मंडई बंद राहिल्याने शेतकरी संतप्त (Farmers Aggressive) झाले आणि त्यांनी भाजीपाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि मार्केट बंद करण्याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले.

काही वेळातच शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी गाड्यांमधून भाजीपाला काढून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला आणि शेतकऱ्यांना तेथून पळवून लावले.

भीलवाडा शहरातील अजमेर तिराह येथे उभारण्यात आलेली तात्पुरती भाजीमंडई हटविण्यासाठी एसडीएम आहवाद निवर्ती सोमनाथ (आयएएस) यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पोहोचले होते. तेथे जमलेल्या लोकांना हटवण्याचे समजावून सांगितले जात होते, त्याच दरम्यान काही शेतकरी आपली वाहने घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. प्रशासनाने कोणतीही माहिती न देता अचानक मंडईचे काम बंद केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बाजार प्रशासनाशी चर्चा

बाजारात दररोज जाम असतो. ही बाब लक्षात घेऊन कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून या भाजी विक्रेत्यांना कृषी मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याची योजना राबविण्यात येत आहे. एक- दोन दिवसांत सर्व काही सामान्य होईल. शेतकरी त्यांच्या काही कर समस्यांचा उल्लेख करत आहेत. बाजार प्रशासनाशी बोलून यावरही तोडगा काढण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Lathi charge on farmers in bhilwada rajasthan know what is reason nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2024 | 08:25 AM

Topics:  

  • Rajasthan News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.