
Top Marathi News Today : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य
Marathi Breaking News Live Updates : आता भारताची ताकद आणखी वाढणार आहे. कारण, अग्नि-5 या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. ओडिशातील चांदीपूर येथून अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. या नव्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारताने आपली संरक्षण क्षमता आणखी मजबूत केली आहे.
अग्नि-5 हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटरपर्यंत अचूकपणे लक्ष्य करू शकते आणि त्यात MIRV तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे एकच क्षेपणास्त्र अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते. अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधुनिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि वॉरहेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. ज्या गोष्टीची पाकिस्तानच्या मनात धडकी बसली होती, अखेर ते भारताने करून दाखवले. भारताने बुधवारी मध्यम अंतराची बॅलेस्टिक मिसाईल अग्नि-5ची यशस्वी चाचणी केली आहे.
ओडिशातील चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज केंद्रात ही चाचणी झाली. पाकिस्तानमध्ये या मिसाईलची इतकी धडकी आहे की, चाचणीच्या एक दिवसाआधी इस्लामाबादच्या थिंक टँकने अग्नि-5 बाबत पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता.
21 Aug 2025 05:59 PM (IST)
बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या आशिया कपसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली ज्यामध्ये फॉरवर्ड शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल, ज्यातील विजेत्याला पुढील वर्षी १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या पुरुष विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. डेंग फ्लिकर हरमनप्रीत सिंग संघाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर राजिंदर सिंग, लाक्रा आणि दिलप्रीत भारतीय संघाचा भाग होते. शमशेर सिंगच्या जागी राजिंदरची निवड करण्यात आली तर आंतरराष्ट्रीय हॉकीमधून नुकतेच निवृत्त झालेल्या ललित उपाध्यायच्या जागी लाक्राची निवड करण्यात आली.
21 Aug 2025 05:46 PM (IST)
गेली ५ ते ६ दिवस उरण तालुक्यात व परिसरात जोरदार वादळ वारा व पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे.भरतभाई डालकी (44) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई डरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती.
21 Aug 2025 05:28 PM (IST)
अंधत्वमुक्त महाराष्ट्र घडवणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन, वनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार झाला. या उपक्रमांतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांतील १,८०० शाळांमधील तब्बल ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
21 Aug 2025 05:15 PM (IST)
काल दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तता यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातील आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या सुरक्षेत आता मोठी वाढ तसेच महत्वाचा बदल केला जाणार आहे. आता ज्यावेळेस मुख्यमंत्री रेखा गुप्ता या जनसुनावणी घेतील, तेव्हा त्यांच्याभोवती सुरक्षेचे मोठे कडे असणार आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळ कोणी जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
21 Aug 2025 05:11 PM (IST)
रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. यासंबंधीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. बुधवारी (२०) सकाळी ९ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली. दरम्यान, ही मासेमारी बोट गुजरातमधील असल्याचे समजते.या घटनेची माहिती मिळताच, सीआयएसएफ आणि नौदलाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जीवितहानी झाली आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काहीही उघड झालेले नाही.
21 Aug 2025 05:00 PM (IST)
संगमनेर तालुक्यात घुलेवाडी येथील हनुमान मंदिरात हरीनाम सप्ताहामध्ये हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांच्या किर्तनात गोंधळ घालून किर्तन बंद पाडल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथे घुलेवाडी येथे झालेल्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला.खडकी येथील हनुमान भजनी मंडळानी संगमनेर येथील घुलेवाडी येथे हरीनाम सप्ताहामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ खडकी गावातून काळ्या फित लावून निषेध मोर्चा काढला. झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. वारकरी मंडळीवर एक प्रकारे अत्याचारच करत आहे. या समाजकंटकाना चांगलाच धडा शिकवला पाहीजे. अशा लोकांना धडा शिकवला नाही तर वारकरी संप्रदाय धोक्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी वारकरी मंडळींनी आपले मनोगत मांडले आहे.
21 Aug 2025 04:55 PM (IST)
ठाणे महानगरपालिकेच्या डीपीआरमध्ये प्रस्तावित रस्ता रद्द झाल्याने खारेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रस्त्यामुळे अनेक घरं, इमारती आणि मंदिरे बाधित होणार होती. मात्र नागरिकांच्या हरकतींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे रस्त्याची योजना रद्द करण्यात आली. घरे वाचल्याने खारेगावमध्ये जल्लोषाचे वातावरण असून ग्रामदेवी मंदिरात आरती, पेढे वाटप आणि बँड वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
21 Aug 2025 04:50 PM (IST)
गेले काही वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्येत घसरण होत असल्याची बाब सातत्याने पुढे येत आहे. पटसंख्या वाढीसाठी शाळांकडून विविध उपक्रम राबविले जात असून अशाचप्रकारे एका शाळेने पटसंख्या वाढीसाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या भिंतीच बोलक्या करण्यात आल्या आहेत. शिक्षणप्रेम जागवणारे संदेश, सर्जनशील चित्रे आणि पर्यावरणाविषयी जागृकता या संदर्भातील चित्रे शाळेच्या भिंतीवर रेखाटण्यात आली आहेत. या चित्रांमुळे शाळेचे रुपडे पालटले असून विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहेत.
21 Aug 2025 04:45 PM (IST)
गेल्या 24 तासापासून नाशिक मध्ये पावसाची सतत दार सुरू असल्याने नाशिक मध्ये अनेक धरण हे शंभर टक्के भरले आहे तरी गंगापूर धरण हे नाशिकचे मुख्य धरण असून या धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सुरू केला असून तसेच रामकुंड परिसरामध्ये यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
21 Aug 2025 04:40 PM (IST)
भिवंडीतील खर्डी येथे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांच्या सहकऱ्याची कार्यालयाबाहेर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणी विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, विकी म्हात्रे हे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांचे जवळचे मानले जातात. कुटुंबीयांनी मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली असून, खासदार सुरेश म्हात्रे व त्यांचा पुत्र सुमित म्हात्रे यांच्या मोबाईल सीडीआरची तपासणी करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. ही केस फास्टट्रॅकवर चालवावी तसेच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आला आहे भिवंडी शहरातील खर्डी परिसरात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
21 Aug 2025 04:35 PM (IST)
उल्हासनगर शहर कबुतरांच्या प्रचंड उपद्रवामुळे अक्षरशः कबुतरखान्यात बदलले आहे. सार्वजनिक ठिकाणी, मंदिर, उड्डाणपुल, इमारतींवर हजारो कबुतरे वावरत असून, त्यांच्या विष्ठा व पिसांमधून श्वसनविकार, दमा, फुफ्फुसांचे आजार झपाट्याने वाढत आहेत. डॉक्टरांच्या इशाऱ्याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयानेही कबुतरांमुळे रोग पसरत असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एक हात मदतीचा’ या संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी पालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुल, गोलमैदान, साईबाबा मंदिर परिसर अशा ठिकाणी कबुतरांचा सर्वाधिक उपद्रव असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
21 Aug 2025 04:30 PM (IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जनतेला दिले होते. ऊस, कांदा व इतर शेतमाल तसेच दुधाच्या दरात वाढ व मराठा, धनगर व इतर जात समूहाचे आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे जनतेला आश्वाशित केले होते. आपण सत्तेवर आलात व मुख्यमंत्री झालात मात्र या गंभिर विषयांबाबत आपण चालढकल करत आहात असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अत्यंत कठिण परस्थितीत असून कर्जबाजारी झाला आहे. महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करीत आहेत, आपण निवडणुकीत कर्जमाफी बाबत आश्वाशित केल्याने तो मोठ्या अपेक्षेने याबाबत आपणाकडे आस लावून बसला आहे. सरकारने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी करून बळीराजाला सुखी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.
21 Aug 2025 04:25 PM (IST)
खड्डे आणि रस्ते संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी घेतली केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यागणेशोत्सवाच्या आधी खड्डे बुजवा, रस्ते दुरुस्त करा असा इशाराच महेश गायकवाड यांनी दिला आहे.
21 Aug 2025 04:20 PM (IST)
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा विविध रंगी, विविध प्रकारच्या वस्तूंनी फुलून गेल्या आहेत. फुलांच्या तसेच विजेच्या माळा, सजावट साहित्यांनी स्टॉल्स सजलेले दिसत आहेत. आपल्या लाडक्या बाप्पांच्या आराशीच्या साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. गणेश सजावट स्पर्धा या सिंधुर्गात प्रामुख्याने घेतल्या जातात आणि हे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती पाहायला मिळत आहे.
21 Aug 2025 04:18 PM (IST)
पुणे: सध्या राज्यभर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र सुंदर धबधबे, हिरवागार निसर्ग पाहायला मिळत आहे. सर्वत्र गारेगार आणि सुंदर असे वातावरण तयार झाल्यामुळे लोकांचा पर्यटनाकडे पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यात देखील निसर्गाचे सुंदर असे रूप खुलले आहे. दरम्यान पुण्यातील प्रसिद्ध किल्ले सिंहगडावर देखील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र सिंहगड किल्ल्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
21 Aug 2025 04:15 PM (IST)
गेली ५ ते ६ दिवस उरण तालुक्यात व परिसरात जोरदार वादळ वारा व पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे.भरतभाई डालकी (४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती.
21 Aug 2025 04:10 PM (IST)
शासनाकडून कोट्यवधी रुपयांची बिले थकीत असल्याने राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार हतबल झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभागाचा थकीत बिलांचा आकडा 90 हजार कोटीच्या वर जाऊन पोहोचल्याच कंत्राटदार संघटनांकडून सांगितले जात असून शासनाने आमची फसवणूक केल्याचा आरोपही ते करतायत. वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्याने नाशिकमध्ये कंत्राटदार संघटना आक्रमक झाल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ते निषेध व्यक्त करतायत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कंत्राटदारांनी 19 ऑगस्टपासून तिन दिवसीय आंदोलन सुरू केले असून आज त्यांनी शासनाची अंतयात्रा काढत बांधकाम विभागाच्या कार्यालयात ही यात्रा काढण्यात आली आहे.
21 Aug 2025 04:00 PM (IST)
ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरंब आर्टसच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्षे गणपती बाप्पाची मखर तयार केली जात आहेत. या कामात कैलास देसले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनिषा तसेच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटींगपासून फिटींगपर्यंत, नक्षीकामापासून रंगसजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यात रंगलेलं आहे. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो. कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविधारंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतो.
21 Aug 2025 03:59 PM (IST)
पुणे: महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारने वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड असे केले आहे. या नावाला केंद्र सरकारची मंजूरी मिळाली आहे. वेल्हे तालुक्याला राजगड नाव देण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला या वेल्हे तालुक्यात येतो. याच किल्ल्याचे नाव आता या वेल्हे तालुक्याला देण्यात आले आहे.
21 Aug 2025 03:53 PM (IST)
भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. तंत्रज्ञान, उद्योग, सेवा, शिक्षण आणि शेतीसह विविध क्षेत्रात देश झपाट्याने प्रगती करत आहे. तरीसुद्धा, या प्रगतीच्या शर्यतीत एक मोठा प्रश्न आजही डोके वर काढतोय तो म्हणजे तरुणांची बेरोजगारी.
21 Aug 2025 03:47 PM (IST)
राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.
21 Aug 2025 03:28 PM (IST)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) नुकतेच परतलेले भारतीय अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी (Shubhanshu Shukla) गुरुवारी दिल्लीत आपला अनुभव सांगितला.
21 Aug 2025 03:22 PM (IST)
एक मोठी माहिती समोर आली आहे. रशियाने ॲडमिरल नाखिमोव युद्धनौकेवर लढाऊ विमानांची चाचणी सुरु केली आहे. गेल्या २८ वर्षानंतर रशियाने व्हाइट सीमध्ये किरोव्ह श्रेणीतील युद्धनौका उतरवली आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे वाचा...
21 Aug 2025 03:01 PM (IST)
शेअर बाजारात, गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुपारी १:३६ वाजता त्यांचे शेअर्स २,३४१ रुपयांवर व्यवहार करत होते आणि त्यात सुमारे ७ टक्क्यांची मोठी घसरण झाली.
21 Aug 2025 02:48 PM (IST)
AUS vs SA : दक्षिण आफ्रिका संघ सद्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेला आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवली गेली असून यामध्ये ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर या दोन संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 ऑगस्टला खेळवण्यात आला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा98 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाडीवर अपयशी ठरली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एकझटका बसला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या एका एडम झम्पावर कारवाई केली आहे.
21 Aug 2025 02:48 PM (IST)
सलमान खानच्या लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉसची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या शोच्या प्रीमियरची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खानने पुढे येऊन या शोशी संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. तसेच हा शो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
21 Aug 2025 02:48 PM (IST)
आज २१ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी वाढ दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स २३९.९८ अंकांनी वाढला आहे आणि ८२१०३.४० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय, निफ्टी ५० देखील आज ६०.४० अंकांनी वाढला आहे आणि २५,१०९.४० च्या पातळीवर पोहोचला आहे. दरम्यान, असे अनेक शेअर्स आहेत ज्यात खरेदी-विक्रीचा जोर आहे. यामुळे या शेअर्समध्ये जोरदार हालचाल दिसून येत आहे.
21 Aug 2025 02:47 PM (IST)
पुणे : पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर ऐन सणासुदीत संक्रात आणली असून, लोणीकाळभोर, कोंढवा तसेच वानवडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्ड़वरील तब्बल दहा सराईत गुन्हेगारांवर एकाचवेळी तडीपारीची कारवाई केली आहे. त्यांना शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिक्षेत्रातून तडीपार केले आहे. त्यात टोळीप्रमुख व सदस्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले आहेत. आगामी काळातील सण- उत्सव तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिबंधक आळा घालण्याच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
21 Aug 2025 02:47 PM (IST)
AUS vs SA 2nd ODI: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्याच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मलिकेतील पहिला सामना केर्न्स येथील काझाली स्टेडियमवर येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कांगारुचा ९८ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे केशव महाराज. त्याने आपल्या फिरकीय जादूने कांगारुना झुकवले. आणि मालिकेवर १-० अशी बढत मिळवली. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. तर हा सामना चाहत्यांना टीव्ही आणि ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार आहे यांची माहिती जाणून घेवूया.
21 Aug 2025 02:46 PM (IST)
ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडून स्थानिक महापालिका आणि पालिकेच्या माध्यमातून मंडप शुल्क आकारण्यात येते. मंडळांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी विविध मंडळांनी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महापालिका आणि अंबरनाथ पालिकेला मंडप शुल्क रद्द करण्यासाठी पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीला यश आले असून स्थानिक प्रशासनाकडून येत्या गणेशोत्सवासाठी आणि नवरात्रोत्सवासाठी मंडळांकडून आकारणाऱ्यात येणारे मंडप शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांकडून खासदार डॉ.शिंदे यांचे आभार मानले जात आहे.
21 Aug 2025 02:46 PM (IST)
गणेशोत्सव म्हटलं की मोदक हा नैवेद्याचा अविभाज्य भाग आहे. मोदक हे मिष्टान्न गणपतीला फार प्रिय आहेत असे मानले जाते ज्यामुळे त्याच्या आगमनावेळी मोदकांचा खास प्रसाद अर्पण केला जातो. पारंपरिक उकडीचे मोदक, तळलेले मोदक तर आपण नेहमीच करतो. पण आजच्या काळात नवीन चव आणि आकर्षक प्रेझेंटेशनमुळे मुलं-बालगोपाळही मोदक खाण्यासाठी उत्सुक असतात. म्हणूनच या वेळेस आपण गणपतीसाठी पारंपरिकतेसोबत आधुनिकता एकत्र करून खास रेड व्हेलवेट मोदक तयार करूया.
21 Aug 2025 02:45 PM (IST)
Pakistan airspace closure August 2025 : पाकिस्तानने पुन्हा एकदा अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिकृतरीत्या NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आले असून या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अटकळींना उधाण आले आहे. पाकिस्तान नेमकं कोणत्या मोठ्या हालचालीची तयारी करत आहे, याबाबत कयास बांधले जात आहेत. भारताने अलीकडेच आपल्या स्वदेशी अग्नि-५ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. त्यानंतर लगेच पाकिस्तानकडून हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, हा निर्णय भारताच्या लष्करी प्रगतीबाबतची असुरक्षितता व संभाव्य प्रतिउत्तर म्हणून पाहिला जात आहे.
21 Aug 2025 02:45 PM (IST)
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये अशी काही नावे आहेत ज्यांचा या संघामध्ये समावेश करण्यात आला नाही. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली होती, त्याचबरोबर चॅम्पियन ट्राॅफीमध्ये देखील कमालीची कामगिरी केली होती. त्याचबरोबर यशस्वी जयस्वालला देखील संघामध्ये स्थान मिळाले नाही त्यानंतर बीसीसीआयवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा होताच निवडीवरील वादविवाद तीव्र झाला आहे.
21 Aug 2025 02:44 PM (IST)
कायमच पोटाच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, सतत चिकन मटण खाणे, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यामुळे गॅस, अपचन आणि ऍसिडिटी वाढते. याशिवाय हल्ली प्रत्येक व्यक्ती बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहेत. बद्धकोष्ठता झाल्यानंतर शरीरात विषारी घाण तशीच साचून राहते. पाण्याच्या कमतरतेमुळे आणि शारीरिक हालचालींमुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय पोट स्वच्छ न झाल्यामुळे मल अतिशय कठीण होऊन आतड्यांमधये तसाच साचून राहतो.यामुळे गुदाशयात वेदना, रक्त येणे किंवा मूळव्याध होण्याची जास्त शक्यता असते. मूळव्याध झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात.
21 Aug 2025 01:55 PM (IST)
अमेरिकेतील प्रसिद्ध आणि जगभरातील लोकांच्या मनात स्थान मिळवणारे न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रियो यांचे निधन झाले आहे. त्यांनी बुधवारी २० ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षाचे होते. गेल्या बऱ्याच काळापासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा आजाराने त्रस्त होते. दरम्यान काल बुधवारी (२० ऑगस्ट) त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडिया द्वारे ही माहिती दिली. यामुळे जगभरातून दु:ख आणि कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
21 Aug 2025 01:50 PM (IST)
केंद्र सरकारने आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील सुधारणा सुचवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली दोन नवीन अनौपचारिक मंत्री गट स्थापन केले आहेत. अमित शहा यांना अर्थव्यवस्था क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. या गटात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासह 13 सदस्य असणार आहेत.
21 Aug 2025 01:45 PM (IST)
जागतिक राजकारणात आज वादळ उसळले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीसाठी २५ टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली असतानाच, भारत आणि रशिया यांनी मोठा आर्थिक-ऊर्जा करार केला आहे. यामुळे आशिया खंडात आणि विशेषतः जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठा उलथापालथ होणार हे निश्चित मानले जाते.२१ ऑगस्ट २०२५ रोजी मॉस्को येथे झालेल्या भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) २६ व्या सत्रात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांनी महत्त्वपूर्ण प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या केल्या.
21 Aug 2025 01:35 PM (IST)
राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
21 Aug 2025 01:30 PM (IST)
राज्यामध्ये कबूतरखाना हा वादाचा विषय ठरला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कबूतरखाना आहे. मुंबई न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई पालिकेने दादर भागातील कबूतरखाना बंद केला आहे. यावरुन मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. कबूतरखाना बंद करत ताडपत्री देखील पालिकेकडून टाकण्यात आली होती. मात्र आंदोलन करत जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली. तसेच कबुतरांना खायला घालायला सुरुवात केली. हे प्रकरण तापलेले असून यावर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
21 Aug 2025 01:25 PM (IST)
गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आला आहे. अशा स्थितीत एका आरोग्यसेविकेची प्रकृती गंभीर झाली. याची माहिती होताच त्यांना हेलिकॉप्टर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचविले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रतिकूल परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी एका आजारी आराग्यसेविकेसाठी दाखवलेली तत्परता पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन घडवणारी ठरली.
21 Aug 2025 01:15 PM (IST)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते मॉस्कोमध्ये २६ व्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) बैठकीसाठीत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे समकक्ष आणि उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह याच्यासोबत सह-अध्यक्षपद भूषवले.या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियातील (India Russia Relations) व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक भागीदारीवर चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही देशांमध्ये शेती, उर्जा, उद्योग, कौशल्य विकास, गतिशीलता, शिक्षण आणि संस्कृती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला.
21 Aug 2025 01:05 PM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर भेट दिली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
21 Aug 2025 12:50 PM (IST)
संगमनेर मध्ये किर्तनकार बापू भंडारे यांच्याविरोधात थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत. थोरात समर्थकांनी मोर्चा काढला आहे. त्यात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे काही नेते सहभागी झाले आहेत. गृह खात्याचा अशा प्रवृत्तीला पाठिंबा असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
21 Aug 2025 12:44 PM (IST)
जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील सांबा जिल्ह्यातील जटवाल भागात एक खाजगी बस खड्ड्यात कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
21 Aug 2025 12:35 PM (IST)
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कबुतराच्या मुद्यावरुन जैन समाजाला कानपिचक्या दिल्या आहेत. माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर आपण काय करतो, नाय नाय, गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
21 Aug 2025 12:15 PM (IST)
“अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचं आहे. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या जाणार आहे. काय होणार आहे धारावीत. कोणते रस्ते होणार आहे. पुण्यासारखी परिस्थिती आहे. पुण्यात जाऊन बघा. थायलंडला जाऊन बघा. फक्त ब्रिज आणि मेट्रोने नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला वाहने नियंत्रित कराव्या लागतील,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुनावलंय.
21 Aug 2025 12:10 PM (IST)
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रेरणा स्थळ येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.
#WATCH | INDIA alliance Vice-Presidential nominee, former Supreme Court Judge B Sudershan Reddy pays tribute to Mahatma Gandhi at Prerna Sthal, ahead of filing nomination)
(Video: Congress MP) pic.twitter.com/D6BgGfLUsO
— ANI (@ANI) August 21, 2025
21 Aug 2025 11:55 AM (IST)
त्तेशी पंगा घेतला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात, तरीही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणांवर आवाज उठवत असल्याबद्दल अनेक हितचिंतक काळजीच्या स्वरात बोलतात. पण सामान्य आणि गरीबांच्या कल्याणकारी योजनांचा पैसा डोळ्यांदेखत हडप केला जात असेल तर आमच्या नेत्यांसह आम्ही सत्तेशी कदापि तडजोड करणार नाही आणि शांतही बसणार नाही. निवडणुकीत विरोधकांनी सत्तेची पूर्ण ताकद लावूनही मी निवडून आलो तो जनतेचा आवाज म्हणून लढण्यासाठीच… म्हणून सामान्य माणसासाठी कायमच लढत राहणार..! शेवटी, #मराठी_माणूस कधीही दिल्लीपुढं झुकत नाही….!, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
21 Aug 2025 11:47 AM (IST)
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे. राज्यात घरोघर गणपती येतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
21 Aug 2025 11:30 AM (IST)
मनसेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिलेआहे की "मुंबईकरांनी भाजपला नाकारले! मुंबईत बॅलेट पेपरवर काल दोन निवडणुका झाल्या. पोर्ट ट्रस्टमधे १५ पैकी ११ जागा ठाकरेंना मिळाल्या. तर बेस्ट पतपेढीच्या २१ पैकी १४ जागा इतरांना मिळाल्या. भारतीय जनता पक्षाचा बॅलेट पेपरवर दोन्ही ठिकाणी पराभव झाला आहे. मग भाजपाला आसुरी आनंद कशाचा झाला आहे?"