
केरळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. केरळमध्ये अरुणाचल प्रदेशमधील रहिवासी असलेला एक कामगार (Maigrant Worker) मॉब लिंचिंगचा बळी (Kerala Mob Lynching Case) ठरला आहे. या कामगारावर त्याच्या माजी महिला सहकारीच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप करत जमावाने त्याला झाडाला बांधून मारहाण केली. जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी केरळ पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.
[read_also content=”कझाकस्तान सीमेजवळ धरण फुटलं, अनेक घरे उद्ध्वस्त, 4500 हून अधिक लोकांची सुटका! https://www.navarashtra.com/world/russia-evacuates-4500-people-after-dam-burst-near-kazakhstan-border-nrps-521319.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री घडली. २४ वर्षीय अशोक दास केरळमधील मुवट्टुपुझा येथे कामगार म्हणून काम करत होता. अशोक दास हा मूळचेाअरुणाचल प्रदेशचा. मात्र तो बराच काळ येथे राहून आपला उदरनिर्वाह करत असे. तो मुवट्टुपुझा येथील वलकम येथे भाड्याच्या घरात राहत होता. गुरुवारी रात्री तो त्याच्या माजाी महिला सहकारीच्या घरी गेला. तिथे त्याचा महिला सहकारीसोबत वाद झाला. यावेळी त्यांनं चांगलात गोंधळ घातला. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं जमा झाली. लोकांनी केलेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाला.
अशोक दास गुरुवारी असलेल्या महिला माजी सहकाऱ्याच्या घरी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. आणि घराबाहेर काहीतरी गडबड सुरू केली. रात्री झालेल्या गोंधळामुळे अनेक लोक महिलेच्या घरासमोर जमा झाले. लोकांनी त्याला पकडून झाडाला बांधले. त्याला झाडाला बांधल्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. मात्र, स्थानिक नागरिक याला नकार देत आहेत. त्याला मारल्यानंतर तो जखमी झाला होता. काही लोकांनी त्याला गंभीर अवस्थेत पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अशोक दास यांना रुग्णालयात नेले. येथील त्यांची प्रकृती पाहता त्यांना कोलेनचेरी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालात शक यांच्या डोक्यावर आणि छातीवर गंभीर जखमांच्या खुणा होत्या ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अशोक दास यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी घाईघाईने एफआयआर नोंदवला. याप्रकरणी दहा संशयितांना अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण वलकम येथील रहिवासी आहेत. केरळ पोलिसांनी सांगितले की, हत्येच्या आरोपाखाली विजय, अनिश, सत्यन, सूरज, केसव, इलियास के पॉल, अमल, अतुल कृष्णा, एमिल आणि सनल यांना अटक करण्यात आली आहे.