Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Session Of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन ‘या’ तारखेपासून होणार सुरु, केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी दिली माहिती

Monsoon Session Of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा झाली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी याची माहिती दिली आहे.पहलगाममधील दहशतवादी हल्ला हे पहिलं अधिवेशन असणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2025 | 03:18 PM
संसदेचं पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून होणार सुरु (फोटो सौजन्य-X)

संसदेचं पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून होणार सुरु (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Monsoon Session Of Parliament: संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा झाली असून पुढील महिन्यात २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी ही माहिती दिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज विषयक मंत्रिमंडळ समितीने या तारखांची शिफारस केली आहे आणि ती मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली आहे. विरोधी पक्षांचे नेते पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी सरकारकडे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत असताना त्यांनी पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे.

लग्न सोहळ्यावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रेलर गाडीवर उलटला अन्…

तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संसदेच्या विशेष अधिवेशनाची सातत्याने मागणी केली जात आहे. यादरम्यान सरकारने ही घोषणा केली आहे. तसेच संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट समितीने राष्ट्रपतींना पाठवलेल्या शिफारशींनुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत चालेल.

विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात नियमांनुसार सर्व मुद्द्यांवर चर्चा करता येते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन तीन महिन्यांहून अधिक काळानंतर २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बोलावले जाईल.

ऑपरेशन सिंदूरनंतर पहिले संसदीय अधिवेशन

पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर हे पहिले संसदीय अधिवेशन असेल. पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष आधीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत असल्याने हे अधिवेशन वादळी ठरू शकते असे मानले जाते. एक दिवस आधी, इंडिया अलायन्सच्या १६ पक्षांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी प्रश्नांची यादी

यापूर्वी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स वर पोस्ट केले होते की, “आम्ही, इंडिया अलायन्सचे नेते, २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आमची सामूहिक आणि तातडीने विनंती पुन्हा करतो.” त्यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि इतर प्रमुख विरोधी नेत्यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्राचाही उल्लेख केला आहे.

केंद्र सरकारवर देशवासीयांना आणि त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना अंधारात ठेवल्याचा आरोप करत खरगे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या लष्करी संघर्षादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पूंछ, उरी आणि राजौरी येथे नागरिकांच्या हत्येबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते म्हणाले की, “युद्धविराम घोषणा” आणि त्यांचे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि परराष्ट्र धोरणावर होणाऱ्या परिणामांबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्याची शक्यता

सरकार पावसाळी अधिवेशनात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव देखील आणू शकते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पुढील संसद अधिवेशनात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबत विविध राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.

Union Cabinet Minister Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, जातींच्या जनगणनेवर भर; पंतप्रधान सरकारचा अजेंडा सादर करणार

Web Title: Monsoon session to commence from july 21 op sindoor pahalgam terror attack to take centre stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Kiren Rijiju
  • Monsoon Session
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

काँग्रेस खासदारांची ओम बिर्लांना शिवीगाळ; किरेन रिजीजू म्हणाले, “ते चांगल्या मनाचे नाहीतर…”
1

काँग्रेस खासदारांची ओम बिर्लांना शिवीगाळ; किरेन रिजीजू म्हणाले, “ते चांगल्या मनाचे नाहीतर…”

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका
2

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.