Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Elections 2025 : SIR चा मुद्दा तापला! बिहारच्या निवडणुकीपूर्वी दिल्लीत ‘या’ दिवशी विरोधक काढणार मोर्चा

बिहारमधील निवडणूक प्रक्रियेवरील वाद वाढत चालला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधक निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा देखील काढणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 07, 2025 | 12:30 PM
Opposition to march to Election Commission over SIR process displeasure over Bihar election 2025

Opposition to march to Election Commission over SIR process displeasure over Bihar election 2025

Follow Us
Close
Follow Us:

Bihar Elections 2025 : पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी जोरदार राजकारण तापले आहे. बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) वरून वातावरण तापले आहे. याचा परिणाम दिल्लीपर्यंत पोहचला असून पावसाळी अधिवेशनामध्ये देखील SIR चे परिणाम दिसून आले आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या सुधारणांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सरकारवर संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनी या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की सरकार SIR बद्दल बोलू इच्छित नाही कारण ते काहीतरी लपवू इच्छित आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली आहे आणि ११ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे विरोधकांनी ठरवले आहे. दुसरीकडे, केंद्र सरकार म्हणते की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे संसदेत त्यावर चर्चा करता येणार नाही. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे, परंतु चर्चा नियमांनुसारच झाली पाहिजे, असे मत सरकारकडून मांडण्यात येत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सरकार SIR वर चर्चा का करू इच्छित नाही?

कॉंग्रेस नेते वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “सरकार आम्हाला SIR या शब्दाबद्दल बोलूही देत नाहीत, असे का? निवडणूक आयोगाने ही व्यवस्था सुरू केली, पण ते SIR वर चर्चा करण्यापासून पळून जात आहेत. त्यांना काय लपवायचे आहे? भारतातील लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की SIR का होत आहे, त्याची गरज काय आहे? आमचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आधार आणि निवडणूक ओळखपत्रे समाविष्ट करण्यास सांगितले आहे, परंतु ते सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकत नाहीत. मतांचे विभाजन करण्याचा हा स्पष्टपणे एक छुपा अजेंडा आहे, असा गंभीर आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

विरोधी पक्षांची आघाडी असलेली इंडिया अलायन्स म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्सचे नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुऱ अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होणार आहेत. हा मोर्चा ११ ऑगस्ट रोजी दिल्लीतील अशोका रोडवरील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात होईल. यामुळे बिहारच्या निवडणुकीपूर्वी दिल्लीचे वातावरण तापले आहे.

Web Title: Opposition to march to election commission over sir process displeasure over bihar election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • Delhi Politics

संबंधित बातम्या

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास
1

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Bihar Election 2025: ओवेसीमुळे इंडियाचे आठ जागांवर नुकसान; MIMचा पाच जागांवर मिळवला विजय
2

Bihar Election 2025: ओवेसीमुळे इंडियाचे आठ जागांवर नुकसान; MIMचा पाच जागांवर मिळवला विजय

Ajit Pawar NCP: अजित पवारांना अंधारात ठेवले; राष्ट्रवादीने लढवली बिहारची निवडणूक; किती मिळाल्या जागा?
3

Ajit Pawar NCP: अजित पवारांना अंधारात ठेवले; राष्ट्रवादीने लढवली बिहारची निवडणूक; किती मिळाल्या जागा?

प्रशांत किशोर करणार राजकारणाला राम राम? बिहारमधील दारुण पराभावर काय घेणार भूमिका
4

प्रशांत किशोर करणार राजकारणाला राम राम? बिहारमधील दारुण पराभावर काय घेणार भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.