Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajnath Singh : नेहरुंना सरकारी पैशातून बाबरी मशीद बांधायची होती; राजनाथ सिंह यांचा खळबळजनक आरोप, वाद पेटणार?

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. पंडित नेहरु हे बाबरी मशीद बांधू देऊ इच्छित असल्याचे ते म्हणाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 03, 2025 | 12:24 PM
Rajnath Singh said Pandit Nehru wanted to build Babri Masjid in Ayodhya with government funds

Rajnath Singh said Pandit Nehru wanted to build Babri Masjid in Ayodhya with government funds

Follow Us
Close
Follow Us:
  • राजनाथ सिंह यांची पंडित नेहरुंवर टीका
  • पंडित नेहरु सरकारी पैशातून बाबरी मशीद बांधण्याचा प्रयत्न
  • सरदार पटेल यांनी विरोध केल्याचा दावा
Rajnath Singh : नवी दिल्ली : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. यंदाच्या अधिवेशनामध्ये दिल्ली बॉम्बस्फोट, सुरक्षा यंत्रणा आणि वंदे मातरम अशा विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, नुकतेच प्रभू श्री रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) बांधकाम पूर्ण झाले असून मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा अयोध्या राम मंदिर हे चर्चेत आले. याबाबत आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु आणि बाबरी मशीद यांच्याबाबत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि बाबरी मशीदबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, “नेहरु यांनी पब्लिक फंडातून बाबरी मशीद बांधण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी सरदार पटेल यांनी या योजनेला स्पष्टपणे नकार दिला. त्यावेळी सरदार पटेल यांनी सरकारी पैशाने बाबरी मशीद बांधू दिली नाही. त्यानंतर नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर सरदार पटेल यांनी हा वेगळा विषय आहे, असं उत्तर दिलेलं” असं राजनाथ सिंह म्हणाले. तिथे 30 लाख रुपये जनतेने दान केलेले. ट्रस्ट बनवण्यात आली. या कामात एकाही सरकारी पैशाची गरज लागली नाही.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदे असुरक्षित, त्यांची पायमुळं उखडून काढण्याचा प्रयत्न; सुषमा अंधारेंनी दाबली महायुतीची दुखणी नस

पुढे ते म्हणाले की, “पटेल यांच्या निधनानंतर जो पैसा जमा झालेला, तो नेहरु यांनी विहिरी आणि रस्ते बनवण्यासाठी खर्च करावा असा सल्ला दिलेला. त्यांचा वारसा दडपण्याचा प्रयत्न झाला. पटेल खऱ्या अर्थाने उदार आणि निष्पक्ष नेते होते. त्यांनी कधीच तृष्टीकरणाचं राजकारण केलं नाही” असे दावे राजनाथ सिंह यांनी केले. “1946 साली अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नेहरु यांना अधिक मते मिळाली. पण गांधीजींच्या सांगण्यावरुन पटेल यांनी आपलं नाव मागे घेतलं आणि नेहरु अध्यक्ष झाले. त्यानंतर ते पंतप्रधान बनले” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

हे देखील वाचा : ‘निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

“सरदार पटेल पंतप्रधान होऊ शकले असते, पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही पदाची लालसा बाळगली नाही. संरक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले की, नेहरूंशी वैचारिक मतभेद असूनही, त्यांनी महात्मा गांधींना वचन दिल्यामुळे त्यांच्यासोबत काम केले. त्यांनी असा दावा केला की गांधींच्या सल्ल्यानुसार पटेल यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नेहरू १९४६ मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाले. १९४६ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. काँग्रेस समितीच्या बहुतेक सदस्यांनी वल्लभभाई पटेल यांचे नाव सुचवले. गांधीजींनी पटेल यांना नेहरूंना राष्ट्रपती बनू देण्यास आणि त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले तेव्हा त्यांनी लगेच त्यांचे नाव मागे घेतले.” असे देखील राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

Web Title: Rajnath singh said pandit nehru wanted to build babri masjid in ayodhya with government funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Babri Masjid
  • Pandit nehru
  • Rajnath Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.