गुवाहाटी : ईशान्येकडील आसाम राज्यामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे महापुराची स्तिथी उद्भवली आहे. महापूरामुळे आसामच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. सुमारे साडेतीन लाखांहून अधिक लोक आसाम राज्याच्या अनेक भागात अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती गंभीर झाल्यामुळे प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले आहे.
महापूरमध्ये शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे एकोणीस जिल्ह्यांमध्ये महापूर आल्यामुळे घरे, पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सूमारे ३० हुन अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. पुरामुळे जनावरांची सुद्धा दैना उडाली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. आसाम राज्यामधील १० जिल्ह्यातील ३१०० नागरिकांना अजून सुद्धा पाण्याखाली राहावे लागत आहे. पंधरा हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे.
तसेच १०० हुन अधिक मदत छावण्यांची उभारणी करण्यात आली आहे. कामरूप, हैलाकांडी, उदालपूरी, होजई, मलबारी, धृबी, करीमगंज, दक्षिण सलमारा, गोलपारा इत्यादी एकूण ३० लाख ९० हजार लोकांना लोकांना पुराचा फटका बसला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर आता कमी झाला आहे. तरीही १९ जिल्हे अजूनही पुरग्रस्तच आहेत.
आसमधील करीमगंज जिल्याला पुराचा जास्त फटका बसला आहे. पुरस्तिथीमुळे सुमारे २ लाख ४० हजार लोक बेघर झाले आहेत. धर्मतुल आणि कामपूर येथील नद्यांनी पाणीपातळी ओलांडली आहे. त्यामुळे करीमगंज येते पुराची स्तिथी गंभीर आहे. पुरामुळे ४७४१ हेक्टर क्षेत्रातील जमीन पाण्याखाली गेली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हसाओ, कामरूप आणि करीमगंज मध्ये बऱ्याच ठिकाणी भूस्सखलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.