Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार; विरोधी पक्षांच्या मागणीला यश

संसदेच्या पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून आहेत आहे. त्याआधी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दीड तास सर्वपक्षीय बैठक घेतली. दरम्यान केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 20, 2025 | 04:29 PM
अखेर केंद्र सरकार 'ऑपरेशन सिंदूर'वर संसदेत चर्चा करण्यास तयार; विरोधी पक्षांच्या मागणीला यश

अखेर केंद्र सरकार 'ऑपरेशन सिंदूर'वर संसदेत चर्चा करण्यास तयार; विरोधी पक्षांच्या मागणीला यश

Follow Us
Close
Follow Us:

संसदेच्या पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू आहेत आहेु. त्याआधी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दीड तास सर्वपक्षीय बैठक घेतली. दरम्यान केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूर आणि इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. मात्र ही चर्चा संसद नियमांनुसारच होईल. सरकार कोणत्याही चर्चेपासून मागे हटणार नाही, असं किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

INDIA Alliance Online Meeting : सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’; इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक पार

किरेन रिजिजू म्हणाले की, बैठकीत सरकारने सर्व राजकीय पक्षांचे मुद्दे शांतपणे ऐकले. विरोधकांकडून पहलगाममधील अतिरेकी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर चर्चा व्हावी आणि त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उपस्थित राहावेत, अशी मागणी करण्यात आली. यावर उत्तर देताना रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान मोदी बहुतेक वेळा संसद परिसरात उपस्थित असतात, जरी ते चर्चेत थेट सहभागी होत नसले तरी ते घटनांची दखल घेत असतात.

केंद्र सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण १७ विधेयकं सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांना सरकार चर्चेद्वारे उत्तर देईल, “आपण प्रत्येक गोष्टीला बाहेर माध्यमांसमोर उत्तर देऊ शकत नाही. संसद सुरळीत चालावी, ही जबाबदारी सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांचीही आहे. अनेक लहान पक्षांना बोलण्यासाठी वेळ मिळत नाही, या मुद्द्याकडेही लक्ष दिलं जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.

विरोधकांनी मांडलेले काही प्रमुख मुद्दे म्हणजे – पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्या संदर्भातील राज्यपालांचे विधान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर केलेलं विधान, बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकनाची प्रक्रिया, तसेच चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या सीमांवरील ‘टू-फ्रंट अ‍ॅक्सिस’शी संबंधित चिंता. याशिवाय, मणिपूरमधील बिघडलेली परिस्थिती यावरही चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

याच बैठकीत एका गंभीर विषयावरही भाष्य करण्यात आलं म्हणजे न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड सापडली होती, ज्यामध्ये अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत होत्या. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

AAP News : ‘आप’ला मोठा धक्का! आमदार अनमोल गगन मान यांचा राजीनामा, राजकारणही सोडले

या प्रकरणावर विचारताना रिजिजू यांनी स्पष्ट केलं की, केवळ सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही, सर्व राजकीय पक्षांची सहमती आवश्यक आहे. मात्र त्यांनी हे देखील जाहीर केलं की, सरकार न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडणार आहे. यासाठी १०० हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी करून आपली सहमती दिली आहे. महाभियोग प्रस्ताव कधी मांडला जाईल, हे अद्याप ठरलेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र तो प्रस्ताव निश्चितपणे संसदेत आणला जाईल, असं रिजिजू यांनी सांगितलं.

Web Title: Union government agree to discussion on operation sindoor pahalgam terror attack in parliament monsoon session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Monsoon Session
  • monsoon session 2025
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Kashmir Solidarity Day : Operation Sindoor च्या जखमांवर पांघरुण घालणार पाकिस्तान? काश्मीरच्या नावाखाली पुन्हा जनतेला मुर्ख बनवणार
1

Kashmir Solidarity Day : Operation Sindoor च्या जखमांवर पांघरुण घालणार पाकिस्तान? काश्मीरच्या नावाखाली पुन्हा जनतेला मुर्ख बनवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.