Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे विधवांचे गाव आहे! पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय? शापामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे मृत्यू…

भारतात एक असे गाव आहे, जिथे ७५ टक्के महिला विधवा आहेत. येथील परिस्थिती इतकी बिकट आहे की, विधवा महिलांनाच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतात. त्यांच्या मृत्यूची कारणे तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2025 | 05:46 PM
पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय? शापामुळे नाही तर 'या' कारणामुळे मृत्यू...

पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय? शापामुळे नाही तर 'या' कारणामुळे मृत्यू...

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात एक गाव आहे ज्याला ‘विधवांचे गाव’ म्हणतात
  • ‘या’ गावातील सर्वाधिक पुरुषांचा मृत्यू
  • पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय?
भारतात विवाह ही एक सामाजिक व्यवस्था आहे. ज्यामध्ये दोन व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहण्याचा आणि कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेतात.कायदे, नियम, रीतिरिवाज, समजुती आणि पद्धतींने एकमेकांना स्विकारतात. लग्न करण्यापूर्वी मुलाची आणि त्याच्या कुटुंबातील चौकशी केली जाते, जेणेकरून नवीन घरात मुलीला कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची विशेष काळजी घेतली जाते. पण भारतात असं एक गाव आहे, बहुतांश महिलांनी त्यांचे पती गमावले आहेत. या सर्व महिलांचे जीवन संघर्षांनी भरलेलं आहे.या गावाला विधवांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात लग्नानंतर पतीचा मृत्यू होतो म्हणून कोणतेही पालक लग्नासाठी या गावात मुली देताना विचार करतात. असं कोणतं गावं आहे जाणून घेऊया…

काय सांगता! आता एनवेळी तिकीट करता येणार रद्द…. 21 दिवसात मिळणार परतफेड; विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील बुधपुरा गावाला ‘विधवांचे गाव’ म्हणूनही ओळखले जाते. या गावात राहणाऱ्या बहुतेक महिला विधवा आहेत. लग्नानंतर अनेकाचे पती लवकरच मृत्यू पावतात. त्यापैकी बहुतेकांवर त्यांच्या लहान मुलांना वाढवण्याची मोठी जबाबदारी असते. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की त्यांच्या पतीचा मृत्यू कसा होत असेल?

काय आहे कारण?

अर्थातच, आता असं वाटत असेल की, हे गाव शापिते आहे किंवा येथील पुरुष काही रहस्यमय कारणामुळे मरतात. तर असं कोणतेही कारण नाही. येथील पुरुषांचा मृत्यू सिलिकोसिस नावाच्या आजाराने झाल्याचे अनेक अहवालांनी पुष्टी केली आहे. खरं तर, या गावातील बहुतेक पुरुष खाणींमध्ये काम करतात आणि त्यांना हा आजार होतो. वेळेवर आणि योग्य उपचारांअभावी त्यांचा मृत्यू होतो.

ते कसे जगतात

गावातील बहुतेक विधवा महिलांना कोणताही आधार मिळत नाही. परिणामी, त्यांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्याच खाणींमध्ये काम करावे लागते. या खाणींमध्ये तासन्तास वाळूचे दगड फोडावे लागतात. कोरीवकाम करताना निर्माण होणारी धूळ फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकते. उपचारांमुळे जीव वाचू शकतात, परंतु अन्यथा मृत्यू निश्चित आहे.

वाळूचे खडक फोडण्याचे काम

पतीच्या मृत्यूनंतरही येथील सर्व महिलांना मुलांचे संगोपन करण्यासाठी खाणीत काम करावं लागतं. बुधपुरा येथे वाळूचे खडे फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केलं जातं. या कामात बाहेर पडणाऱ्या सिलिका धुळीमुळे त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग होतो. दुर्दैवाने, रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत, त्यांना श्वास घेण्यास अधिक त्रास होतो आणि त्यांना जीवघेणे आजार होतात. या गावात अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी खाणीत काम केल्यामुळे पती गमावले आहेत.

Supreme Court News: ‘तुम्ही आम्हाला टाळत आहात का…?’ CJIभूषण गवईंनी थेट केंद्र सरकारला फटकारले

Web Title: Village of widows in india rajsthan s budhpura village know reason behind death of men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • india
  • rajasthan
  • Trending News

संबंधित बातम्या

Karma Global News: Karma Global ची वेबिनार सिरीज यशस्वी; 2500 हून अधिक सहभागींनी घेतला सहभाग 
1

Karma Global News: Karma Global ची वेबिनार सिरीज यशस्वी; 2500 हून अधिक सहभागींनी घेतला सहभाग 

India US Trade: अमेरिकेचे ‘MAGA’ शेतकरी त्रस्त, पण भारत ठाम; फक्त ट्रम्प समर्थकांसाठी दिल्ली ‘Red Line’ ओलांडणार नाही
2

India US Trade: अमेरिकेचे ‘MAGA’ शेतकरी त्रस्त, पण भारत ठाम; फक्त ट्रम्प समर्थकांसाठी दिल्ली ‘Red Line’ ओलांडणार नाही

India Israel: मोदी-नेतान्याहूंची ‘डेथ पंच’ युती देणार ‘Turkey-Pakistan’च्या कराराला प्रतिउत्तर; भारत बनणार क्षेपणास्त्र निर्माता
3

India Israel: मोदी-नेतान्याहूंची ‘डेथ पंच’ युती देणार ‘Turkey-Pakistan’च्या कराराला प्रतिउत्तर; भारत बनणार क्षेपणास्त्र निर्माता

Mexico tariffs on India: मेक्सिकोच्या निर्णयाने भारतीय उद्योगात खळबळ! भारताची तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात धोक्यात
4

Mexico tariffs on India: मेक्सिकोच्या निर्णयाने भारतीय उद्योगात खळबळ! भारताची तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.