Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!

भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांनी बांग्लादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, आता बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे या कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राने बांगलादेशातील वस्त्रोद्योग, उर्जा, फार्मास्युटिकल्स यासारख्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 05, 2024 | 07:47 PM
'या' भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!

'या' भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडील काही वर्षांमध्ये भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राने बांग्लादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळेच बांग्लादेशची अर्थव्यवस्था मजबुत झालेली पाहायला मिळाली. तेथील मोठी लोकसंख्या, नैसर्गिक वायूचे साठे आणि स्वस्त मजूर यामुळे भारतीय कंपन्यांनी बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली. बांग्लादेश हा भारतासाठी आग्नेय आशियाचा प्रवेशद्वारही देखील मानला जातो. बांगलादेशशी भारताचे आर्थिक आणि राजकीय संबंध इतर शेजारी देशांपेक्षा खूपच चांगले आहेत. ज्यामुळे भारतातील कंपन्यांनी त्या ठिकाणी मोठी गुंतवणूक केली. मात्र, आता ही गुंतवणूक धोक्यात आली आहे.

कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. तसेच त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. ज्यामुळे सध्या बांगलादेशच्या लष्कराने सत्ता हाती घेतल्याने, भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये हिंसाचार वाढला आहे. ज्यामुळे आता या कंपन्यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राने बांगलादेशातील वस्त्रोद्योग, उर्जा, फार्मास्युटिकल्स यासारख्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आणि स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत.

हेही वाचा : बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?

या कंपन्यांनी केलीये बांग्लादेशात गुंतवणूक

अनिल अंबानी यांच्या अंबानी समूहाची ऊर्जा कंपनी रिलायन्स पॉवर, अदानी समूह, सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी एनटीपीसी यांनीही बांगलादेशमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, गोदरेज आणि सीएटी टायर्स यांच्या उत्पादन सुविधा बांगलादेशमध्ये आहेत.

अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरने देखील बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने ढाक्याजवळ मेघनाघाट येथे 3000 मेगावॅट क्षमतेचा एलएनजी आधारित ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. याशिवाय कंपनी पेट्रोबांग्लाच्या सहकार्याने चटगावमध्ये एलएनजी टर्मिनलही उभारत आहे. गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर लिमिटेडची उपकंपनी असलेली अदानी पॉवर, झारखंडमधील गोड्डा येथे असलेल्या पॉवर प्लांटमधून बांगलादेशला 1600 मेगावॅट वीज पुरवठा करत आहे.

Web Title: Concerns of indian companies investment in danger due to instability in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 06:50 PM

Topics:  

  • sheikh hasina

संबंधित बातम्या

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
1

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
2

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद
3

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण
4

‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.