Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरी जिल्हा जलमय, जाणूनघ्या मागील २४ तासात कोणत्या तालूक्यात किती पाऊस?

रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून कोंढेतड पुलानजीक सुमारे ३५ ते ४० वयाची एक व्यक्ती वाहून गेल्याची घडली आहे.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jul 13, 2021 | 01:38 PM
रत्नागिरी जिल्हा जलमय, जाणूनघ्या मागील २४ तासात कोणत्या तालूक्यात किती पाऊस?
Follow Us
Close
Follow Us:

अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

सुरुवातीचे काही दिवस दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री मारली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे.

रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कोंढेतड पुलानजीक सुमारे ३५ ते ४० वयाची एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.

मागील २४ तासात कोणत्या तालूक्यात किती पाऊस?

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या २४ तासांत सरासरी ११५ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक १५३ मिमी पाऊस राजापुरात पडला आहे. रत्नागिरी ७२ मिमी, चिपळूण १२३ मिमी, लांजा १२३ मिमी, मंडणगड १३७ मिमी, खेड ११८ मिमी, दापोली ७९ मिमी, गुहागर १३२ मिमी आणि संगमेश्वर १०२ मिमी पाऊस पडला आहे.

दरम्यान, सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे कोकणचे मुख्य पीक असलेली भात शेती पाण्याखाली गेली आहे.

Web Title: Heavy rains in konkan nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2021 | 01:38 PM

Topics:  

  • heavy rains in ratnagiri

संबंधित बातम्या

Monsoon Alert: मोठी बातमी! वीर धरणातून २७ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू तर जगबुडीने…; राज्याची स्थिती काय?
1

Monsoon Alert: मोठी बातमी! वीर धरणातून २७ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू तर जगबुडीने…; राज्याची स्थिती काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.