Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी पॅकज देणारा मुख्यमंत्री नाही तर…; उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

  • By Navarashtra News Network
Updated On: Jul 30, 2021 | 05:27 PM
मी पॅकज देणारा मुख्यमंत्री नाही तर…; उद्धव ठाकरेंचे मोठं विधान
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : पूरस्थिती दरवर्षी निर्माण होत आहे. यामुळे काही ठिकाणी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. यंदाचे महापुराचे संकट भयंकर आहे. राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करायचा नाही. सातत्याने पूरबाधित नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन गरजेचे आहे. यासाठी लवकरच मुंबईत सर्वपक्षीय बैठक घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात दिली. ‘मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे’, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना भरीव मदतीचा शब्द दिला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शिरोळ तालुक्यातील पूरबाधित ठिकाणे, कोल्हापूर शहरातील पूरगस्त ठिकाणाची पाहणी केली. पूरस्थितीबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. पूरनियंत्रणाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने बोलताना ठाकरे यांनी संरक्षित भिंत बांधणे हा ही एक पर्याय असल्याचे नमूद केले.

पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, ‘यंदाचे संकट भयंकर आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महापुरासोबत कोरोना महामारीशी लढाई सुरू आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जीवितहानी टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. पूरनियंत्रण आणि कायमस्वरुपी उपाययोजनेसंबंधी मुंबईत सर्वपक्षीय बैठक घेऊ. अभ्यास करुन योग्य आराखडा तयार करणार आहे.

जनतेच्या जीवाशी खेळायचे नाही

‘पूररेषेच्या आतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय ब्ल्यू व रेडलाईन पुढे बांधकामांना परवानगी नाही. राज्याच्या जनतेच्या जीवाशी खेळायचे नाही. पूरस्थितीवरुन कसलेही राजकारण करायचे नाही. यामुळे कसल्याही वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही. वेडीवाकडी मदत केंद्राकडे मागणार नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा केंद्राकडे मदत मागू. दरम्यान, केंद्राने बँका, विमा कंपन्यांना तत्काळ सूचना देण्याची गरज आहे. यासंबंधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहिले आहे. विमा कंपन्यांनी ५० टक्के रक्कम तत्काळ देण्याची गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: I am not the cm who gives the package but the cm who helps says uddhav thackeray nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2021 | 05:27 PM

Topics:  

  • Package
  • Uddhav Thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.